ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
दिवसाला कोट्यवधी रुपये खर्च होणाऱ्या अधिवेशनांचे योग्य फळ जनतेला मिळालेच पाहिजे.

दिवसाला कोट्यवधी रुपये खर्च होणाऱ्या अधिवेशनांचे योग्य फळ जनतेला मिळालेच पाहिजे.

प्रकाशन: 20 Dec 2024 01:31 PM
वाचन संख्या 170

मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांची भूमिका.

प्रतिनिधी : मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी सरकारच्या अधिवेशनांबाबत भूमिका मांडताना प्रसिद्धी संदेशद्वारे सांगितले आहे की जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देश व त्यातील राज्ये ह्यांतील सरकारच्या अधिवेशनांवर दिवसाला कोट्यावधी रुपये खर्च होत असतो आणि तो स्वाभाविक आहे. हा होणारा खर्च कर व विविध माध्यमातून जनतेच्याच खिशातून होत असतो. अधिवेशनांसाठी इतका खर्च होणे यात काही गैर नाही परंतु त्या अधिवेशनांचे उद्देश हे जनतेच्या कल्याणासाठी आहेत. सर्व लोकप्रतिनिधींनी देखिल त्यांचा मौल्यवान वेळ जनतेसाठी दिलेला असतो त्यामुळे वेळ, श्रम, बुद्धी व पैसा अशा चार महत्वपूर्ण गोष्टींचं गांभीर्य राखत अधिवेशनांचे कामकाज होणे अपेक्षित आहे. या अधिवेशनांचे जनतेला योग्य फळ मिळालेच पाहिजे.

श्रीकांत सावंत यांनी पुढे सांगितले आहे की, महाराष्ट्र व देशातील युवा पिढिने अधिवेशनातील कामकाजांचा नागरीक म्हणून मागोवा घेणे, अभ्यास करणे ही राष्ट्राच्या विकासासाठी गुंतवणूक ठरू शकते.सध्या महागाई व बेरोजगारी सारखे मूलभूत प्रश्न ऐरणीवर असून आपण प्रत्येक सरकारचा घटक असलेल्यांची जबाबदारी व जागरुकता महत्वाची आहे असेही श्रीकांत सावंत यांनी सांगितले आहे. येणार्या काळात सत्ताधारी व विरोधी हे दोघेही समर्थपणे जनतेच्या विकासासाठी अत्यंत समर्थपणे झटत राहतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 281

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स