ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
Koyna Dam Water Level : यंदाच्या हंगामात दमदार पाऊस कोयना, वारणेत किती पाणी

Koyna Dam Water Level : यंदाच्या हंगामात दमदार पाऊस कोयना, वारणेत किती पाणी

प्रकाशन: 19 Aug 2024 12:39 PM
वाचन संख्या 129

सांगली : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात दमदार पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील पाच प्रमुख मध्यम आणि ७८ लघु प्रकल्पांत पाणीसाठा वाढला आहे. कोयना, वारणा धरण जवळपास ८८ टक्के भरले असून जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ५१ टक्के पाणीसाठा झाला आहे.

चांगल्या पावसामुळे शेती सिंचनासह शहरी भागांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. जिल्ह्यात जून महिन्यात अडखळत हजेरी देणाऱ्या पावसाने जुलै महिन्यात जोरदार बॅटिंग केली होती.

तब्बल २१ दिवस पावसाने जिल्ह्यात हजेरी दिली होती. चालू ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यानंतर मात्र पावसाचा जोर कमी झाला आहे. यामुळे शेतीशिवारात कामांना गती आली आहे.

जिल्ह्यातील मध्यम आणि लघू असे एकूण ८३ प्रकल्प आहेत. यापैकी २२ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. शिराळा तालुक्यातील वारणा, तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा आहे.

गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्के जादा पाणीसाठा जिल्ह्यात गतवर्षी दि. १६ ऑगस्टला २१ टक्के पाणीसाठा होता. यामुळे खरीप हंगाम वाया गेला होता. पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली होती; पण यावर्षी दि. १६ ऑगस्टला ५१ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा ३० टक्के जास्त आहे.

२२ तलाव १०० टक्के, १५ तलाव ७५ टक्केजिल्ह्यातील ८३ मध्यम आणि लघु प्रकल्पापैकी २२ तलावांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच १५ तलावांमध्ये ७५ टक्के तर १२ तलावांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा आहे. सहा तलावांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा जास्त तर आठ तलावांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा झाला आहे.

कोयना ८६ तर वारणा धरण ८८ टक्के भरलेजिल्ह्यातील नागरिक आणि शेतीसाठी उपयोगी असणारे कोयना धरण ८६ टक्के आणि वारणा धरण ८८ टक्के भरले आहे. तसेच जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या तलावांमध्येही सरासरी ५१ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असल्यामुळे खरीप पिकांचा प्रश्न सुटला आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स