उलट सुलट चर्चांना महत्व देत नाही : श्री. किरण सामंत.
ब्यूरो न्यूज : उद्योजक व नेते श्री. किरण सामंत यांचा फोन, काल ७ मे या लोकसभा मतदाना दिवशी सकाळच्या सत्रात नाॅट रिचेबल असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिल्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात काही तास उलट सुलट चर्चा सुरु होत्या. मतदानाच्या अखेरच्या सत्रात श्री किरण सामंत यांनी मतदानाचा अधिकार बजावला. दरम्यान त्यांना ‘नाॅट रीचेबल’ विषयी विचारले असता त्यांनी त्यांचा फोन नाॅट रीचेबल वगैरे नव्हता तर फोनमधील सीम कार्डची तांत्रिक समस्या होती असे सांगितले. तसेच आपला चालक तसेच इतर सहकारी तसेच कुटुंबीय यांचे फोन सुरु होते अशीही माहिती दिली. या दरम्यान ज्या उलट सुलट चर्चा झाल्या त्याला आपण महत्व देत नाही असेही त्यांनी सांगितले. आपण आपली जबाबदारी पार पाडत होतो व त्याचा निकाल ४ जून दिवशी दिसेलच असेही त्यांनी स्पष्ट केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)