युवतीसेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा यतीन खोत यांनी वीजेच्या लपंडावाबद्दल व्यक्त केली नाराजी ; व्यावसायिक व सामान्यांचे अतोनात हाल होत असल्याची व्यक्त केली खंत.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात आज १० जानेवारीला दिवसभर व विशेष करून दुपारनंतर झालेल्या विजेच्या लपंडावाबद्दल युवतीसेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा खोत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विजेच्या अशा वारंवार दीर्घ अवधीसाठी खंडित होण्याने सध्या दिवसाचा वाढता उकाडा, आर्द्रता तसेच व्यापारी व व्यावसायिक वर्गासाठी सुद्धा पंचाईत होत असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले आहे. सध्या बहुतांश इंटरनेट संदर्भातील अत्यावश्यक संदेश वहनाची कामेसुद्धा डिजीटल कामेसुद्धा वायफाय वर अवलंबून असल्याने त्या कामांमध्येही वारंवार व्यत्यय येत असल्याने शैक्षणिक गोष्टींवरही त्याचा परिणाम होत आहे असे युवती सेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा खोत यांनी स्पष्ट केले आहे.
हा विजेचा खंडित होण्याचा खेळखंडोबा थांबवण्यात यावा अन्यथा याबाबत नागरिक, व्यापारी, व्यावसायिक यांच्यात तीव्र नाराजी निर्माण होऊन कुठलीही संवेदनशील परिस्थिती निर्माण झाल्यास याला वीज मंडळ सर्वतोपरी जबाबदार राहील असे त्यांनी स्पष्ट केले. नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर वीज मंडळाने बहुतांश डागडुजी, दुरुस्ती करुन मालवणात वीज समस्या भेडसावू नये ही काळजी घेतली होती तशीच काळजी नियमीतपणे सामान्य नागरिकांसाठी व मालवणात येणार्या पर्यटकांसाठी घेतली गेली तर वीज मंडळाची प्रशंसाच केली जाईल असेही सौ. शिल्पा यतीन खोत यांनी सांगितले आहे. जर तांत्रिक दुरुस्ती व बिघाड असेल दोनच दिवसांपूर्वी सोमवारी वीज मंडळाचे साप्ताहिक लोडशेडिंग तथा वीज पुरवठा खंडीत केलेला असताना त्यादिवशीच सर्व कामे मार्गी लावणे अपेक्षित असताना हा रोजचा अध्येमध्ये मध्ये होणारा वीजपुरवठा गृहिणींच्याही अनेक दैनंदिन कामांचा प्रचंड खोळंबा करतो अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)