इन्सुली घाटीमध्ये ट्रक कलंडला; जिवीतहानी नाही.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील इन्सुली घाटीत आज पहिल्या पावसाच्या सुरुवातीलाच ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने निसरड्या रस्त्यामुळे अपघात झाला. आज संध्याकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणा-या ट्रकच्या चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक धातूच्या संरक्षक कठड्याच्या खांबाना धडकला.परंतु सुदैवाने ट्रक दरीत कोळसताना थोडक्यात कठड्याला अडकला. या अपघातामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)