मगरींच्या वास्तव्याबाबत बांदा तेरेखोल नदीपात्र येथे सुरक्षा फलक
बांदा /राकेश परब: बांदा येथील तेरेखोल नदीपात्रात मगरींची संख्या वाढली असून दिवसेंदिवस पाळीव जनावरे व शेतकऱ्यांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. स्थानिकांनी, तसेच पर्यटकांनी याबाबत सावधानता बाळगण्यासाठी वन विभाग व ग्रामपंचायत प्रशासनातर्फे नदीपात्रालगत वर्दळीच्या ठिकाणी सुरक्षा फलक लावण्यात आले. यावेळी बांदा वनपाल अनिल मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्या श्रेया केसरकर, साई तेली, मंदार सावंत, शैलेश केसरकर यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या फलकांवर मगरींच्या वास्तव्याबाबत माहिती देत नदीपात्रात उतरणे धोकादायक असल्याचे सूचित करण्यात आले आहे. स्थानिकांनीही सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनपाल मेस्त्री यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)