#खरी_तिरंगा..
विशेष
खरंतर माधुरी चिंतामण परांजपे अशी ती मूळची…अगदी लहान वयात प्रापंचिक जबाबदारी आणि संसारगाडा वगैरेत ती आली…
पण तिच्यातील लेखिका अखंड होती.
वर तिरंगा शब्द वापरलाय त्याची कारणं मुद्दाम सांगतो.
पहिला रंग : आहार आणि आरोग्य विषयक एक प्रकल्प तिने जगाला दाखवला….
दुसरा रंग : अख्ख्या जगात कोणालाही मराठी,हिंदी व्याकरणाचा अभ्यास नसेल तेवढी संपत्ती यांच्या डोक्यात आहे.(यात थोडंफार त्यांचे पती श्रीनिवास पंडित यांचाही वाटा आहे)
तिसरा रंग : माणसं मुलांना मोठं करतात. पण मुलांच्या मुलांना मोठं करणारी शक्ती म्हणजे वैशाली पंडित.
त्यांचा नातं जर ,”आजी मुळे अक्कल व सेहत..आजी मुळे विकास” शब्द वापरतो तेंव्हा आजी वैशाली पंडित मॅडम कुठल्या लेवलच्या आहेत ते समजते..
फालतु रस्त्यावर कोणीतरी काही लिहीले….मुलगा व्यसनाधीन वगैरे टोमणे बसले….स्तनाच्या कर्करोगाने वर्चस्व दाखवायचे प्रयत्न केला…
पण ढळला नाही त्यांचा तिरंगा..!
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल आणि समूहाच्या निर्माती वैशाली श्रीनिवास पंडित यांना संपूर्ण आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल व समूहातर्फे तिरंगी वंदन….
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)