समस्त मुंबईस्थीत पळसंब वासियांना अनोख्या पद्धतीने मिळणार आषाढ वारीचा आनंद..! (विशेषवृत्त)
गोरेगांवातील मसुराश्रमात रंगणार “विठू नामाचा गजर..!”
कणकवली | प्रसन्ना पुजारे (विशेषवृत्त) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांव व मुंबईस्थीत पळसंबवासीय यांचे सामाजिक,शैक्षणिक,औद्योगिक स्तरांवर विविध उपक्रम सुरु असतात.
येत्या रविवारी म्हणजे 10 जुलैला , मुंबईस्थीत पळसंब वासियांसाठी रिद्धी क्रिएशन व स्वर पराग निर्मित ‘आम्ही वारकरी विठ्ठलाचे’ हा भक्ती नजराणा घेऊन येत आहेत.
आषाढ महिना महिना आला की सर्व विठ्ठल भक्तांना ओढ लागते ती वारीची, ऊन पाऊस वयाचा विचार न करता लाखो भक्त पायी पंढरीच्या वाटेने श्री संत तुकाराम आणि श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी बरोबर चालत असतात. सर्वसामान्य म मुंबईकर भक्तांना इच्छा असूनही हे प्रापंचीक व्यस्ततेमुळे शक्य नसते म्हणून ‘रिद्धी क्रिएशन व स्वर पराग निर्मित’ या भक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याचा शुभारंभ ,रविवार १० जुलैला गोरेगांव पूर्व येथील सुप्रसिद्ध मसुराश्रम येथे, ‘रिद्धी क्रिएशन आणि स्वर पराग’ निर्मित ‘आम्ही वारकरी विठ्ठलाचे’ हा विठ्ठल भक्तिमय गीतावर आधारित गायन नृत्य दिंडी अशा भक्तिमय कार्यक्रमाद्वारे होत आहे.
या कार्यक्रमात समस्त मुंबईस्थीत पळसंब वासियांनी सहभागी होऊन विठ्ठल अनुभूतीचा अनुभव घ्यावा असे आवाहन व निमंत्रण आपले नम्र रिद्धी क्रिएशन आणि स्वर पराग संस्थेच्या विठ्ठल भक्तांनी केले आहे.
गोरेगांव (पूर्व) येथील मसूराश्रम हॉल, पांडुरंग वाडी, रोड नंबर ४ इथे हा सोहळा आयोजीत केला गेला असून मसुराश्रम हे ठिकाण गोरेगांव रेल्वे स्टेशनपासून चालत अवघ्या दहा मिनिटांवर आहे.
या सोहळ्याविषयी अधिक माहितीसाठी 9819902414/9619971485 या दोन भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधायची सोय केली गेली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)