" यशामध्ये आणि अपयशामध्ये जो संतुलित राहतो तो खरा विद्यार्थी " - प्रा. राजाराम परब .
काळसे येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन…!
चौके | प्रतिनिधी :
” यशस्वी व्हायचं असेल तर परिस्थितीच्या छाताडावर पाय देउन उभ राहता आलं पाहिजे, परिस्थितीच रडगाणं न सांगता आलेल्या परिस्थितीवर मात करून विजय मिळवा. यशामध्ये हुरळून जाऊ नका आणि अपयशाने खचून जावू नका. यशामध्ये आणि अपयशामध्ये जो संतुलित राहतो तो खरा विद्यार्थी. तुम्ही किती बुद्धिमान किती श्रीमंत आहात यापेक्षा तुमच्या कामात किती सातत्य आहे यावरून तुमचे यश ठरत असते. तसेच तुमची परिस्थिती कशी असली तरी चालेल यशस्वी होण्यासाठी सातत्य महत्वाचं आहे. ” असे प्रतिपादन परफेक्ट ॲकॅडमी कुडाळचे चेअरमन प्रा. राजाराम परब यांनी काळसे येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने नुकतेच श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे व स्व. सौ. जयश्री वामन प्रभु कला , वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रा. राजाराम परब यांनी स्पर्धा परिक्षेत तसेच शालेय परिक्षांमध्ये कसे यशस्वी होता येईल याविषयी सखोल मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन केले.
यावेळी संस्था अध्यक्ष हेमंत परब , उपाध्यक्ष योगेश राऊळ ,सचिव केशव सावंत , दाजी परब संचालक तथा निवृत्त उपजिल्हाधिकारी विनोद गोसावी, निवृत्त तहसीलदार शरद गोसावी , राजन प्रभु , गजानन प्रभु, सुवर्ण काळसेकर, अध्यापक विद्यालय आजगावचे प्राध्यापक रूपेश पाटील , मुख्याध्यापक तुकाराम पेडणेकर , हितेंद्र काळसेकर आदी मान्यवर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने प्रा. राजाराम परब यांचा शाल श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)