केंद्र सरकारने खतांबाबत घेतेला निर्णय स्वागतार्ह: भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत
चिंदर | विवेक परब :शेतकऱ्यांना शेती करण आता सोपे राहिलेल नाही. बि-बियाणे, खते औषधे व मशागतीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते. एवढे करुनही कधी कधी नैसर्गिक आपत्तीने हाता तोंडाशी आलेली शेती नष्ट होते. अशावेळी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना खतांवर मोठा खर्च करावा लागणार नाही. केंद्र सरकारने यंदा खतांवरील अनुदानात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल आहे.
शेतकऱ्यांबाबत आपले मत आपली सिंधुनगरीकडे व्यक्त करताना भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत म्हणाले की केंद्र तथा मोदी सरकारने खतांवर अनुदान देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह आहे. बाजारत कमी दराने खत उपलब्ध होणार असल्याने शेतीवरील खर्चात बचत होणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)