सन्माननीय शिवसेनाप्रमुखांच्याच धड्याचा राज ठाकरे यांनी घेतलाय उजळणी वर्ग : अमित इब्रामपूरकर.
मालवण | ब्युरो न्यूज : शिवसेनेचे संस्थापक, हिंदूह्रदयसम्राट आणि मराठी अस्मितेची आस्था असणार्या सन्मामाननीय कै. बाळासाहेबांनी हिंदुंच्या रक्षणासाठी,व्यापक हिंदुत्वाचा नारा देत आणि त्यावर ठाम रहात संघटनात्मक काम करुन शिवसेना पक्ष वाढवला याची आठवण खासदार विनायक राऊत यांनी ठेवावी.
मनसे प्रमुख राज ठाकरे हे महाराष्ट्रात दंगली घडवण्याची सुपारी घेत असल्याच्या खासदारांच्या टिकेला उत्तर देताना मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी हे प्रतिपादन केले.
कै.बाळासाहेबांनी मशिदींवरचे भोंगे काढलेच पाहिजेत हे भरसभेत सांगितले होते. सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणास विरोध केला व तिथे महाआरत्यांचे आयोजन केले त्यावेळी दंगल होणार नव्हती काय? राज साहेबांवर सुपारी घेऊन दंगल घडवण्याचा आरोप करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी इतिहासाची आठवण ठेवावी.सत्तेत राहून भ्रमिष्ट झालेले असाल तर त्यावेळच्या माननिय बाळासाहेबांच्या भाषणाच्या क्लिप्स आमच्याकडे आहेत.ते तुम्हाला आम्ही पाठवून देवू.
सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेनेने हिंदुत्व बाजुला ठेवलं आणि राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी युती केली.हे शिवसेनेचे बेगडी हिंदुत्व आहे हे तुम्हाला मान्य करावेच लागेल असेही इब्रामपूरकर म्हणाले.
राजसाहेबांनी हिंदुत्व आणि मराठी अस्मिता यासाठी मनसे पक्षाची स्थापना केली.हे लक्षात ठेवा. सन्माननीय बाळासाहेबांकडूनच राजसाहेबांनी हिंदुरक्षणासाठी बाळकडू घेतले. हिंदुह्रयसम्राट ही बाळासाहेबांची नावासमोरची उपाधी राजसाहेबांनी स्वतः घेतली नाही. आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार पुढे घेउन जाण्याचा प्रयत्न राजसाहेब करत आहेत असेही मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.
कै. सन्माननीय बाळासाहेब यांनी घालून दिलेल्या धड्यांचा उजळणी वर्ग घेतला म्हणून शिवसैनिकांनी आक्षेप घेण्याचे कारण नाही असा टोलाही इब्रामपूरकर यांनी लगावला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)