ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
इन्सुली जंगलमय परिसरात भलामोठा गवा मृतावस्थेत आढळला
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

इन्सुली जंगलमय परिसरात भलामोठा गवा मृतावस्थेत आढळला

प्रकाशन: 13 Mar 2022 06:06 PM
वाचन संख्या 130

बांदा | राकेश परब : इन्सुली-बिलेवाडी येथील वस्तीपासून काहीशा अंतरावर जंगलमय परिसरात भलामोठा गवा मृतावस्थेत आढळून आला आहे. ही घटना आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास स्थानिकांच्या निदर्शनास आली. याबाबतची माहिती त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. दरम्यान वन अधिकारी मदन बाविस्कर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले त्याच्या मागच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला चालता येत नव्हते, त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , बिलेवाडी येथील भर वस्तीपासून काहीशा अंतरावर जंगलमय परिसरात हा मृत गवा आढळून आला. ही घटना तेथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आली . दरम्यान त्यांनी याबाबतची कल्पना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. तर बाविस्कर यांच्या म्हणण्यानुसार त्याच्या मागच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला चालता येत नव्हते . त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.

वस्तीपासून जवळच गव्यांच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात गव्यांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कळपाने वावरणारे गवे शेतीची नासधूस करत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स