पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांचे तहसीलदारांना निवेदन.
चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील पळसंब गावात, तलाठी सजा स्वतंत्र आहे तरिही या गावात कायमस्वरुपी तलाठी नाही ही सद्यस्थिती आहे.गावाला स्वतंत्र तलाठी नसल्याने व सामाईक तलाठ्यांना इतर गावेही असल्याने पळसंब ग्रामस्थांना आवश्यक सरकारी कागदपत्रे वेळेवर मिळत नाहीत. पळसंब गावाला कायमस्वरुपी तलाठी मंजूर करुन गावातील लोकांची गैरसोय त्वरीत टाळली जावी यासाठी पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी मालवणच्या तहसीलदारांना ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने निवेदन दिले आहे.या निवेदनाची दखल घेऊन पळसंब ग्रामस्थांच्या अडचणींना समजून त्यानुसार तत्काळ तलाठी नेमणूकीची कार्यवाही व्हावी अशी मागणी पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी व्यक्त केली आहे
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)