दुर्गवीर प्रतिष्ठानमार्फत किल्ले रामगड स्वच्छता मोहीम..!
चिंदर | विवेक परब : मालवण तालुक्यातील रामगड या गांवात छत्रपतींनी बांधलेल्या किल्ल्यामुळे गांवाला रामगड असे संबोधले जाते.
छत्रपतींचा रामगड येथील हाच ठेवा जपण्यासाठी काही वीरांनी एक उपक्रम राबवला. आजची पिढी ही महाराष्ट्र राज्यातील गड आणि किल्ल्यांचा ठेवा जपण्यासाठी उत्सुक असते. काही अनुभवी इतिहास व पर्यावरण जाणकारांचीही त्यांना साथ लाभते. मग हे सगळे मिळून गड,किल्ले आणि दुर्गांच्या स्वच्छता व डागडुजी मोहीमा आखून त्या राबवतात.
दुर्गवीर प्रतिष्ठान ही अशीच एक किल्ले जपण्यासाठी धडपडणारी एक इतिहासस्फूर्त संस्था आहे. हे प्रतिष्ठान महाराष्ट्रातील दुर्गम व थोड्या अल्पपरिचित किल्ल्यांवर गडकिल्ले संवर्धनाचे काम करते.सिंधुदुर्ग जिल्हात रामगड, भगवंतगड आणि यशवंतगडावर श्रमदानाच्या माध्यमातून काम करते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हासुरकर, उपाध्यक्ष अजित राणे, अर्जुन दळवी, रवींद्र रावराणे, प्रशांत डिंगणकर, प्रभाकर परब, रोहित बालाडे, धीरज राणे, राकेश इंदुलकर, सिध्देश मेस्री, मयुर विचारे, यांच मार्गदर्शन त्यांना लाभते. काल शनिवारी दुर्गवीर प्रतिष्ठानने शनिवार दिनांक 13 नोव्हेंबरला किल्यांची श्रमदान मोहिमेतून साफसफाई केली गेली.
मंदार सरजोशी, मिलिंद चव्हाण, तुषार चव्हाण, चेतन घोणे, सुबोध चव्हाण, मंदार कोयंडे, प्रणय चव्हाण, राज मालोंडकर, संकेत परब, सहना प्रभूदेसाई, ग्रिष्मा साटम, प्रिती खरात यांनी या रामगड मोहीमेत श्रमदान केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)