कायदेशीर समानतेच्या तत्त्वानुसार अन्नसुरक्षेचे नियम सर्व धर्मियांसाठी समान लागू करा.
कायदेशीर समानतेच्या तत्त्वानुसार अन्नसुरक्षेचे नियम सर्व धर्मियांसाठी समान लागू करा.
मालवण तहसीलदारांकडे मंदिर महासंघ, महाराष्ट्र यांच्यावतीने निवेदन.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांच्याकडे, ३ सप्टेंबर २०२६ रोजी 'मंदिर महासंघ, महाराष्ट्र' यांच्यावतीने 'कायदेशीर समानतेच्या तत्त्वानुसार अन्नसुरक्षेचे नियम सर्व धर्मियांसाठी समान लागू' करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी निवेदन देताना श्री गिरोबा देवस्थान नांदरुखचे मानकरी आणि विद्यमान सरपंच रामचंद्र गोविंद चव्हाण, श्री गिरोबा देवस्थान साळेलचे मानकरी आणि माजी सरपंच कमलाकर गावडे, मानकरी राजाराम दाजी गावडे तसेच मंदिर महासंघाचे दीनानाथ गावडे, इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे देवस्थानचे रुपेश साटम, श्री. काळबादेवी मंदिर मालवणचे मानकरी संदीप धुरी, श्री देव रामेश्वर देवस्थान कांदळगावचे मानकरी श्रीराम परब, धर्मप्रेमी महेंद्र पाताडे तसेच श्री देवी भद्रकाली देवस्थान रेवंडीचे मानकरी विजय कांबळी आणि सनातन संस्थेचे अनिकेत फाटक उपस्थित होते.
यावेळी, इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे, श्री देव विठोबा देवस्थान देवबाग मालवण, श्री भद्रकाली देवस्थान रेवंडी, श्री देव रामेश्वर देवस्थान कांदळगाव या देवस्थानांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदने देण्यात आली. ह्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत कार्यवाही करण्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)