ताज्या बातम्या
संरक्षण मंत्री यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रादेवी येथे २६ ऑगस्ट रोजी ८ तासांसाठी अवजड वाहनांना प्रवेशबंदी. ईद - ए- मिलाद, नारळी पौर्णिमा, दहीहंडी व गणेशोत्सव शांततेत साजरे करण्याचे जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांचे आवाहन. जिल्ह्यात उद्यापासून ऑनलाईन खत विक्रीस प्रारंभ. गाबीत समाज सिंधुदुर्ग संस्थेची नूतन विश्वस्त मंडळ व कार्यकारिणी जाहीर. श्री देव पाटेश्वर यांचे दर्शन घेत आमदार प्रमोद जठार यांची सर्वांच्या सुख, समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना. श्री देव कुणकेश्वर मंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवारी माजी आमदार वैभव नाईक यांची सपत्नीक 'प्रथम मानाची' पूजा. कृषी विज्ञान केंद्रात 'जीवामृत' निर्मितीचे प्रात्यक्षिक. विरण येथे राकेश परब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात. सिंधुदुर्ग महाविद्यालयीन एनसीसी सिनियर अंडर ऑफिसर रुपाली करंगुटकर दिल्लीतल्या 'ऑल इंडिया थलसेना' कॅम्पमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार. कै. डॉ. अरविंद खानोलकर यांच्या श्रद्धांजली सभेद्वारा 'सेवा करा, पण तिचा गाजावाजा करू नका' शिकवणुकीला उजाळा देऊया...!
संरक्षण मंत्री यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रादेवी येथे २६ ऑगस्ट रोजी ८ तासांसाठी अवजड वाहनांना प्रवेशबंदी.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

संरक्षण मंत्री यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रादेवी येथे २६ ऑगस्ट रोजी ८ तासांसाठी अवजड वाहनांना प्रवेशबंदी.

संरक्षण मंत्री यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रादेवी येथे २६ ऑगस्ट रोजी ८ तासांसाठी अवजड वाहनांना प्रवेशबंदी.


नागरिकांना तसेच वाहनचालकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करायचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन. 


सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : देशाचे संरक्षण मंत्री यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गोवा प्रशासनाच्या विनंतीवरून 'दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत' अशी ८ तासांसाठी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली चेक पोस्टवरून पत्रादेवी येथे गोवा राज्यात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 


दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी ही खबरदारीची उपाययोजना करण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांनी तसेच वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे. अवजड वाहन चालकांनी या कालावधीत पत्रादेवी मार्गे गोव्याच्या दिशेने प्रवास टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच पोलीस, वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि संबंधित वाहतूक यंत्रणांनी प्रवेशबंदीची प्रभावी अंमलबजावणी करून वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी आवश्यक नियोजन व समन्वय साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स