ताज्या बातम्या
लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...! मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
सिंधुदुर्ग महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जागृतीपर उपक्रम संपन्न.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

सिंधुदुर्ग महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जागृतीपर उपक्रम संपन्न.

सिंधुदुर्ग महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जागृतीपर उपक्रम संपन्न.

Article image

मालवण : मालवण शहरातील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे अर्थशास्त्र विभाग व व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिन विविध जनजागृतीपर उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढती लोकसंख्या, तिचे सामाजिक - आर्थिक परिणाम, कुटुंब नियोजन, आरोग्य जागरूकता आणि शाश्वत विकास या विषयांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. व्ही. हरगिले होते. 


व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख लेफ्ट. प्रा. डॉ. एम. आर. खोत यांनी प्रास्ताविक करताना जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. लोकसंख्या वाढीमुळे देशाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणीय क्षेत्रांवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेत त्यांनी विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक म्हणून लोकसंख्या नियंत्रण व जनजागृतीमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.


यावेळी प्रमुख वक्त्या डॉ. उज्वला सामंत यांनी 'लोकसंख्या वाढ आणि परिणाम तसेच लोकसंख्या नियंत्रणाची आवश्यकता' या विषयावर मार्गदर्शन केले. भारतातील लोकसंख्येची सद्यस्थिती, लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारी, दारिद्रय, शिक्षण, आरोग्य, निवास, अन्नसुरक्षा आणि पर्यावरणीय समस्यांवर त्यांनी विवेचन केले. तसेच कुटुंब नियोजन, महिलांचे शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, आरोग्य सेवा, जनजागृती आणि सुशिक्षित समाजाची निर्मिती या माध्यमातून लोकसंख्या स्थिरतेचे उद्दिष्ट साध्य करता येईल, असे त्यांनी प्रतिपादन केले. 


यावेळी संग्राम पवार, संकेत बेळेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिसबा काझी हिने केले तर गौतम मानवर याने आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरती सामंत, तन्वी साळकर, कु. मयुरेश, कु. मितेश आणि कु. विनीत यांनी परिश्रम घेतले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स