झाराप - पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गाचे काम.
मळगाव मनसेच्या वतीने सहा. अभियंत्यांचे आभार.
मळगाव | प्रतिनिधी : दोन वर्ष झाराप – पत्रादेवी महामार्गावर ( बायपास ) दुपदरीकरणाचा रस्ता निकृष्ट बनला होता. अपघातांची संख्या वाढत होती. दरम्यान पार्श्वभूमीवर मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा सुरू केला होता. आता, या रस्त्याचे काम सुरू झाले असून ग्रामस्थांनी आणि वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.
हा रस्ता लवकरात लवकर पुर्णत्वास न्यावा ही अपेक्षा आणि रस्ता सुरळीत लोकांसाठी चालु करावा, अशी मागणी मळगाव विभाग अध्यक्ष राकेश परब यांनी केली. रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने सुरू केले म्हणून मळगाव मनसे पदाधिकारी आणि सहकाऱ्यांनी पुष्पगुष्छ देऊन सर्व हायवे अधिकाऱ्यांचे आभार मानले, यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ यांच्यासह विद्यार्थी सेना उपजिल्हा अध्यक्ष साहील तळकटकर, शतायु जाभळे, ओंकार नवार, जय राऊळ, महेंद्र कांबळी, विशाल राऊळ, आशुतोष राऊळ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)