ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कोकण व मुंबईच्या सर्वांगिण विकासाच्या निधीसाठी राज्य व केंद्रातील सर्वोच्च नेतृत्वांना 'आत्ताच' प्रश्न विचारा.

कोकण व मुंबईच्या सर्वांगिण विकासाच्या निधीसाठी राज्य व केंद्रातील सर्वोच्च नेतृत्वांना 'आत्ताच' प्रश्न विचारा.

प्रकाशन: 16 Nov 2024 08:36 PM
वाचन संख्या 104

श्रीकांत सावंत यांचे समस्त कोकणवासियांना आवाहन.

प्रतिनिधी : रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे समस्त कोकणवासियांना आवाहन केले आहे. सावंत यांनी म्हणले आहे की, मुंबई व कोकणातील मूलभूत प्रश्न, अत्यावश्यक प्रश्न व सोयीसुविधा याबाबत आपापल्या लोकप्रतिनिधी उमेदवारांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या सर्वोच्च नेतृत्वांना ‘आत्ताच’ ठामपणे प्रश्न विचारायची धमक ठेवून ती मिळवण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. असे एकत्रितपणे झाले तर मुंबई व कोकणातील सर्वांगीण विकासाची तत्पर, नियमित व ठोस कार्यवाही सुरु होईल. कोकणरेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनिकरण तसेच कोकणातिल बंद झालेली बोट वाहतुकीच्या मुद्द्यांबाबतही ठामपणे विचारणा झालीच पाहिजे असे आवाहन श्रीकांत सावंत यांनी केले आहे.

पर्यटनाच्या भरभराटीसाठी सक्षम विमानतळे , सावंतवाडी टर्मीनस, बंदरे विकास याबाबत ठामपणे विचारलं गेलं तरच कोकण व मुंबईच्या जनतेच्या मताचं खर्या अर्थाने सोने होईल. प्रश्नांची सकारात्मक उत्तरे मिळायचा कालावधी जितका कमी होत जाईल तितकी विकाकामांकडे हमखास लक्ष वेधले जाईल असा विश्वास श्रीकांत सावंत यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे व्यक्त केला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स