ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
महावितरणने सतर्क रहाणे गरजेचे होते : तालुका प्रमुख हरी खोबरेकर.

महावितरणने सतर्क रहाणे गरजेचे होते : तालुका प्रमुख हरी खोबरेकर.

प्रकाशन: 23 May 2024 07:04 PM
वाचन संख्या 205

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी मालवण शहर व परिसरामध्ये काल २२ मे च्या वादळी पावसानंतर तब्बल २४ तासांपेक्षा जास्त काळ विजपुरवठा खंडीत झाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. काल, वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने शहर परिसरात काही काळ थैमान घातले होते. यात काही विद्युत खांब व तारांवर झाडांच्या फांद्या पडल्याने शहर परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. २४ तास उलटून गेले तरी वीज पुरवठा पूर्ववत करण्यास महावितरण अपयशी ठरले आहे याकडे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी विशेष लक्ष वेधले आहे. पावसाच्या आरंभीच जर महावितरणची अशी स्थिती असेल तर यंदाचा पावसाळी हंगाम ते ग्राहकांना काय सुविधा देणार असा जळजळीत प्रश्नही हरी खोबरेकर यांनी उपस्थित केला आहे.

गेले काही दिवस हवामान विभागाकडून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त होत होता. त्यानुसार काल सायंकाळी तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली मात्र महावितरण सतर्क नव्हते अशी खंत हरी खोबरेकर यांनी व्यक्त केला आहे. वादळी वारा, पाऊस अशी शक्यता वर्तविल्याने महावितरणने त्यादृष्टीने सतर्क राहणे गरजेचे होते. मात्र पहिल्याच पावसात सुरळीत वीज पुरवठा देण्यास महावितरण अपयशी ठरले. महावितरण कडे विद्युत खांब तसेच अन्य अत्यावश्यक साहित्यच उपलब्ध नसल्याचे दिसून आले. जे खांब धोकादायक आहेत त्यावरूनच नवीन वीज वाहिन्या ओढण्याचे काम करण्यात आले असल्याचाही आरोप खोबरेकर यांनी केला आहे. सरत्या पर्यटन हंगामावरही याचा अनिष्ट परीणाम झाल्याने पर्यटन व्यवसाय व संबंधित सर्वांचे अतोनात हाल होऊन नुकसान झाल्याचेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी सांगितले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 15
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 321

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स