आंबोलीत अपघात; १ ठार ६ जखमी.
ब्यूरो न्यूज | सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या आंबोलीतील नांगरतास येथे ‘महिंद्रा थार’ या कारचा आज सायंकाळी ४;४५ च्या दरम्यान भयानक अपघात झाला.या अपघातात लातूर येथील ६जबर जखमी झाले आहेत आणि आणि एक जण मृत्यूमुखी पडला आहे. नांगरतास येथील आराध्य हॉटेल जवळ ही घटना घडली. थार कार मधील प्रवासी लातूर येरमळा धाराशीव येथून गोव्याकडे जात होते. या अपघाताची तीव्रता इतकी होती की रस्त्याला लागून असलेले एक झाड उन्मळून पडले. कारच्या दर्शनी भाग जवळपास नष्ट झाला. यात दत्ता व्यंकट जाधव (३५ वर्षे ) हे मृत झाले असून ६ सहप्रवासी जखमी झाले. त्यातीत दोनजण गंभीर जखमी झाले. जखमींना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना सावंतवाडी कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जगदीश दुधवाडकर, पोलिस नाईक मनिष शिंदे यांनी सुनिल नार्वेकर, मायकल् डिसोजा, अजय नार्वेकर व इतर सहकारी ग्रामस्थांच्या मदतीने आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. या अपघाताचा पुढील तपास सुरू झाल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
फोटो सौजन्य | सिंधुदुर्ग ब्यूरो
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)