3669 ओव्यांचा श्री गजानन विजयग्रंथ तोंडपाठ असलेल्या सुमतीताई बापट कालवश !
नाशिक /प्रतिनिधी : सुमतीताई बापट या एक मध्यमवर्गीय गृहिणी होत्या.केवळ कुतूहलापोटी श्री गजानन विजय ग्रंथ वाचता वाचता त्या गजानन महाराजांच्या परमभक्त झाल्या.गजानन विजय ग्रंथाचे एकवीस अध्याय त्यातल्या 3669 ओव्यांसह त्यांना मुखोद्गत होते.हा एक स्मरणशक्तीचा आगळा चमत्कारच मानावा लागेल.नव्वदी पार केलेल्या सुमतीताईंनी कोविडकाळात शेकडो ऑनलाईन मुखोद्गत पारायणे केली.आपली सिंधुनगरीसाठी त्यांची एक आठवण अतिशय मौल्यवान आहे.
वैशाली पंडित यांच्या ,’ श्री गजानन विजय ग्रंथाचे साहित्यिक पारायण वंदनीय सुमतीताईंच्या हस्तेच त्यांच्याच निवासस्थानी झाले.वैशाली पंडित,श्रीनिवास पंडित यांच्या सूनबाई दीपाली पंडित यांनाही सुमतीताईंचे आशीर्वाद स्पर्श लाभले होते.प्रकाशनावेळी त्या अतिशय आनंदी होत्या.पुस्तकाला त्यांचा पवित्र स्पर्श झाला हे आपले भाग्य असल्याचे वैशाली पंडित सांगतात.स्मरणशक्तीचा एक लखलखीत अलंकार काळाच्या पडद्याआड गेला असला तरी त्याचे तेज मात्र जनमानसात झळाळतच राहील !
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)