ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीज वितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा..!</em>

<em>वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीज वितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा..!</em>

प्रकाशन: 13 Aug 2022 02:59 PM
वाचन संख्या 41

बांदा | राकेश परब :
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मडुरा दशक्रोशीत मात्र वीज वितरणचा भोंगळ कारभार सुरू आहे. घेराव, उपोषण छेडल्यानंतर भरीव आश्वासन दिली जातात त्याची प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे सेवेच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होत असून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीज वितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना सातार्डा उपविभागप्रमुख तथा मडुरा माजी उपसरपंच उल्हास परब यांनी वीज वितरणला दिला आहे.

श्री. परब म्हणाले की विजेच्या लपंडावासोबत विद्युत वाहिन्या तुटण्याचे अनेक प्रकार घडल्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याची दखल घेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्युत पुरवठा अखंडीत ठेवत कोणताही अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही असा इशारा शिवसेना सातार्डा उपविभागप्रमुख उल्हास परब यांनी दिला आहे.

मडुरा-डिगवाडी परिसरात दोन वेळा विद्युत वाहिन्या तुटण्याचे प्रकार घडले. वाहिनी तुटल्यानंतर वीजपुरवठा खंडित होणे आवश्यक आहे मात्र तसे न झाल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. परंतु यावर विद्युत विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही. विजेचा खेळखंडोबा मात्र सुरूच आहे. तर पाडलोस येथे वाहिन्यांवरील झुडपे तोडताना वाहिन्यांनी अचानक पेट घेतला असे प्रकार यापुढे होता कामा नये अशी तंबीच श्री. परब यांनी अधिकाऱ्यांना दिली. तसेच ग्राहकांच्या माथी भरमसाठ वीज बिले मारून नेमकं काय साध्य करायचे आहे, असा सवाल श्री.परब यांनी केला.
गतवर्षी गणेशोत्सवात मडुरा दशक्रोशीतील गावात वीज गुल होण्याचे प्रकार घडले मात्र यावर्षी तसे सहन केले जाणार नाही. त्यामुळे वेळीच दखल घेत विद्युत पुरवठा अखंडित ठेवण्यासंदर्भात कार्यवाही करावी अशी मागणी उल्हास परब यांनी केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स