<em>पावसाळ्यापूर्वी शेर्ले रस्त्याची डागडुजी न झाल्यास १ मे रोजी महाराष्ट्र दिनी ग्रामस्थांसह उपोषण करण्याचा इशारा</em>…!
बांदा | राकेश परब: शेर्ले झिरो पॉईंट ते तेरेखोल नदीपर्यंत जाणारा रस्ता हा पूर्णपणे खराब झाला असून वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची डागडुजी न झाल्यास १ मे रोजी महाराष्ट्र दिनी ग्रामस्थांसह उपोषणास बसण्याचा इशारा माजी ग्रामपंचायत सदस्य तथा माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष महादेव धुरी यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी ३६ ग्रामस्थांच्या सहीचे निवेदन शेर्ले ग्रामपंचायतला दिले आहे.
श्री धुरी यांनी निवेदनात म्हटले आहे की, या रस्त्यालगत जीवन प्राधिकरण विभागाच्या पाईपलाईन खोदाईचे काम करण्यात आल्याने रस्ता खराब झाला आहे. नादुरुस्त रस्त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. काही ठिकाणी भलेमोठे खड्डे पडल्याने पावसाळ्यात या रस्त्यावरून वाहतूक ही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे जीवघेणा अपघात टाळण्यासाठी व रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आपण जिल्हा परिषदकडे पाठपुरावा करावा असे म्हटले आहे. अन्यथा १ मे रोजी आपण रस्त्यावर बसून उपोषण करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)