सिंधुदिनांक
२६ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – . १५५२ साली ७३ वर्षीय गुरु अमरदास शीख धर्माचे तिसरे गुरु बनले.
सन १६६८ साली इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीच्या मध्यमातून मुंबई प्रांतावर आपले अधिकार प्राप्त केले होते.
इ.स. १७८० साली ब्रिटीश वर्तमानपत्र ब्रीट गैजेट आणि संडे मॉनीटर यांचे प्रकाशण सर्वप्रथम रविवारच्या दिवशी करण्यात आले.सन १९०२ साली नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाल कृष्ण गोखले यांनी मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण केले.
इ.स. १९१० साली लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरवात केली.
सन १९४२ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांचा विवाह फिरोज गांधी यांच्या सोबत आनंद भवन येथे पार पडला.
इ.स. १९७१ साली पाकिस्तान देशातून बांगलादेशाची विभागणी करण्यात आली आणि बांगलादेश स्वातंत्र्य राष्ट्र घोषित करण्यात आलं
सन १९७२ साली भारताचे माजी राष्ट्रपती वी. वी. गिरी यांनी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पहिल्या आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषदेचे उद्घाटन केले.
इ.स. १९७३ साली लंडन स्टॉक एक्सचेंज ने २०० वर्ष जुने ऐतिहासिक नियम मोडीत काढत महिलांना पहिल्यांदाच नोकरीवर रुजू करून घेतले.
सन १९७४ साली झाडांची कत्तल थांबविण्यासाठी गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्वात चिपको आंदोलन सुरु करण्यात आले.
इ.स. २००० साली रशियाच्या अध्यक्षपदी ब्लादिमीर पुतीन यांची निवड करण्यात आली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)