ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिवजयंतीचे औचित्य साधून बालशिवरायांच्या वेशातील विहानच्या हस्ते श्रीलोचन बालविकास केंद्राचा शुभारंभ

शिवजयंतीचे औचित्य साधून बालशिवरायांच्या वेशातील विहानच्या हस्ते श्रीलोचन बालविकास केंद्राचा शुभारंभ

प्रकाशन: 26 Feb 2022 02:32 PM
वाचन संख्या 95

बांदा / राकेश परब : महाराष्ट्रात आराध्य दैवंत , शौर्य व धैर्याची मूर्ती असलेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे लाखो करोड जनतेचे पोशिंदे , ज्यांच्या आईने म्हणजेच राजमाता जिजाऊ यांनी त्यांच्यावर केलेले संस्कार आणि त्यांच्या विचारांच्या जोरावर शिवरायांनी यशाची शिखरे पादाक्रांत केली, अशा शिवबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक मुलाने यश प्राप्त केले पाहिजे आणि म्हणूनच दिन दुबळ्या , निराधार बालकांच्या संगोपनाच्या कामाची सुरुवात अशाप्रकारे मुलांची जबाबदारी घेऊन करावे या विचारांनी कोकण संस्थेच्या माध्यमातून आज आंबेगाव – कात्रज पुणे येथे श्रीलोचन बालविकास केंद्राची सुरुवात करण्यात आली. कोरोनाने भारतातील लाखो मुलांना अनाथ केले, करोडो लोकांना उपसमारीला सामोरे जावे लागले आणि लाखो नोकऱ्या गेल्या तसेच कित्येक लोकांना मानसिक ताप सहन करावा लागला . केंद्र आणि राज्य सरकारने आपल्या परीने सर्वाना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला , अनाथ मुलांना आर्थिक मदत करायची घोषणा पण झालीय पण अजून ही बरीच अशी मुले आहेत ज्यांच्या घरचा कमावता व्यक्ती गेला , आणि कित्येकांनी आई वडील पण गमावले . कित्येक कुटुंबे रोगात गेल्यामुळे उध्वस्त झालीत आणि काही पालक तणावामुळे व्यसनाधीनतेकडे वळले पण मग अशा पालकांच्या मुलांचा यात काय दोष कोणाचा म्हणावा लागेल . अशा जास्तीत जास्त मुलांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून गेल्या ऑक्टोबर मध्ये टिटवाळा येथे श्रीलोचन आश्रमाची सुरुवात करण्यात आली आहे आणि तेथे २२ मुलांचे संगोपन केले जात आहे. पुण्यातील गल्ली स्कुल आणि युवा किरण असे उपक्रम चालवत असताना पुण्यातील अशा मुलांच्या भवितव्यासाठी पुढाकार घ्यावा अशा सूचनावजा विनंती सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात होती , त्या दृष्टिकोनातून संस्थेने पुणे आंबेगाव येथे आज ५० निराधार मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आश्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेने आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना मदत केली असून , ज्यांची काळजी घ्यायला कोणी नाही अशा पुण्यातील मुलांसाठी श्रीलोचन आश्रम हा संस्थेचा दुसरा आश्रम सुरु करण्यात आला आहे.या आश्रमातील प्रत्येक मुलाच्या आरोग्य , शिक्षणाबरोबर त्यांचा सर्वांगिण विकास करण्यात संस्था संपूर्ण पुढाकार घेणार आहे.१९ फेब्रुवारी रोजी या आश्रमाचे उद्घाटन सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत बालशिवरायांच्या रुपात विहान महांगरे यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आले . श्रीलोचन बालविकास केंद्र पुणेची आज सुरुवात करत आहोत असे श्री. दयानंद कुबल यांनी बोलताना सांगितले . यावेळी संस्थाध्यक्ष दयानंद कुबल, योगेश भोसले , संभाजी भोसले, सतीश श्रीखंडे , राजू गावडे , प्रेम कुबल, राहुल शिंदे , सुरज कदम , आनंद कुबल, प्रीती पांगे , साक्षी पोटे , संजय कुलकर्णी , प्रसाद देवरूखकर , नितीन ढम , आकाश देवकर , कुंदन कुबल, धनाजी पाटील , शोभा तावरे आणि २६ मुले उपस्थित होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल महांगरे तर आभार सुप्रिया गाढवे यांनी मांडले

Article image
Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स