भाजपा - वेंगुर्ले च्या वतीने डाॅ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त अभिवादन
ब्यूरो न्यूज /विवेक परब: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी वेंगुर्ले शहरातील आनंदवाडी येथील समाज मंदिरात डाॅ. बाबासाहेबांच्या प्रतीमेस नगराध्यक्ष राजन गिरप व जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच मेणबत्ती प्रज्वलीत करुन त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले . यावेळी आदरांजली वाहताना नगराध्यक्ष राजन गिरप म्हणाले की , विषम समाज व्यवस्थेचे चटके सोसत तमाम वंचीतांना मायेची सावली देऊन , धरतीवरील क्रांतीसुर्य अस्तास गेला . परंतु जाण्यापूर्वी त्यांनी सकल मानव जातीला त्यांचे नैसर्गिक हक्क , न्याय , समान अधिकार बहाल केले . संपूर्ण जगात कुठल्याही देशात नसेल असे महान संविधान अर्पण करुन , बलाढ्य अशी लोकशाही बहाल केली ते म्हणजे विश्वरत्न , परमपुज्य , बोधीसत्व , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर . अशा महामानवास त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम . यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , किसान मोर्चा जि.सरचिटणीस बाळु प्रभु , माजी: उपनगराध्यक्ष गिरगोल फर्नांडिस तसेच आनंदवाडी मधील समाज बांधव उपस्थित होते .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)