ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कालवश…!

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कालवश…!

प्रकाशन: 15 Nov 2021 11:48 AM
वाचन संख्या 69

छत्रपतींचा इतिहास जागवलेल्या एका ऐतिहासिक माणुसपर्वाची अखेर..!

ब्युरो न्यूज | वैभव माणगांवकर : ज्येष्ठ इतिहासकार व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जाणता राजा या महानाट्यातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडला व घराघरात पोहचवला होता. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिया झाल्यामुळे पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले होते. रुग्णालय प्रशासनाने आज सोमवारी पहाटे ५ वाजता त्यांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र घराघरात पोहचवण्यामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची मोलाची भूमिका राहिली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याच्या इतिहासातील गोष्टी त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न केला. जाणता राजा या महानाट्यातून त्यांनी शिवसृष्टी निर्माण करत छत्रपती शिवरायांचा इतिहास जनतेसमोर प्रत्यक्षात मांडण्याचाही प्रयत्न केला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे विविध स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे.
रविवार सायंकाळपासून त्यांच्या प्रकृतीविषयी राज्यभर जाहीर चिंता जाणवली होती. इतिहास जागवलेल्या एका माणुसपर्वाची अखेर झाली अशीच भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स