पद्मश्री डाॅ. डि. वाय. पाटील कालवश.
पद्मश्री डाॅ. डि. वाय. पाटील कालवश.
ब्यूरो न्यूज | कोल्हापूर : शिक्षण, आरोग्य आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत व्यापक योगदान दिलेले व्यक्तिमत्त्व तसेच त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंत पाटील (वय ९१ वर्षे) यांचे कोल्हापूर येथे, आज ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी निधन झाले. सामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म ते राज्यपाल असा त्यांचा व्यापक सामाजिक व राजकीय प्रवास होता.
साल २०२० नंतर, कोल्हापुरातील निवासस्थानी डॉ. डी. वाय. पाटील हे वास्तव्यास असत. मागील सहा महिन्यांपासून त्यांची प्रकृती हळूहळू खालावत चालली होती. घरातच त्यांच्यावर उपचार सुरू होते. २० दिवसांपूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता मात्र त्यातून ते सावरत होते अशी माहिती मिळत आहे. ३ ऑगस्ट रोजी दिवसभरात त्यांची प्रकृती खालावत गेली आणि ४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)