मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 'एक पेड माँ के नाम' उपक्रमांतर्गत वायरी बांध येथे वृक्षारोपण.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 'एक पेड माँ के नाम' उपक्रमांतर्गत वायरी बांध येथे वृक्षारोपण.
श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज संप्रदाय, मालवण आणि अनुलोम यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम.
भाजप एनजीओ आघाडी जिल्हा संयोजक भालचंद्र उर्फ बबलू राऊत आणि मान्यवरांची उपस्थिती.
मालवण : भारत सरकारच्या 'एक पेड माँ के नाम' या पर्यावरण संवर्धन उपक्रमांतर्गत तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अनुलोम संस्थेन्या संपूर्ण महाराष्ट्रात ५७ हजार वृक्ष लागवडीच्या राज्यव्यापी अभियानाचा एक भाग म्हणून श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज संप्रदाय, मालवण आणि अनुलोम यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र दत्त मंदिर, वायरी बांध, मालवण येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीक्षेत्र दत्त मंदिरात सद्गुरूंच्या प्रतिमेचे पूजन करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्यात आला. यावेळी कु. ज्ञानेश्वरी झाड आणि श्री. चैतन्य झाड यांच्याही वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांच्या शुभहस्ते विविध देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाला संस्थेचे सचिव तथा भाजप एनजीओ आघाडी जिल्हा संयोजक भालचंद्र उर्फ बबलू राऊत यांच्यासह संस्था पदाधिकारी विनायक निवेकर, अनुलोमच्या सौ. मानसी केळुसकर, पांडुरंग घाडीगावकर, सौ. अमिता निवेकर, महेश हुले, बंड्या तळाशीलकर, मिलिंद झाड, गोपाळ कवटकर, शेखर झाड, सौ. तृप्ती झाड, सौ. बांदेकर, सौ. प्राची परब, सौ. कांदळगावकर, प्रशांत परब, भूषण हुले, अमित आचरेकर, सौ. सुरेखा सातार्डेकर यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. भालचंद्र उर्फ बबलू राऊत यांनी त्यांच्या मनोगतात पर्यावरणाचे रक्षण ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे असे स्पष्ट केले. वृक्षारोपण ही केवळ एकदिवसीय मोहीम नसून वृक्षांचे संगोपन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे असे आग्रहाचे आवाहन करताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण उपयोगी उपक्रम राबवून त्यांना शुभेच्छा देण्याच्या अनुलोमच्या संकल्पनेची श्री. राऊत यांनी प्रोत्साहनपर प्रशंसा केली.
विनायक निवेकर, अमित आचरेकर आणि सौ. अमिता निवेकर यांनीही पर्यावरण संवर्धनासाठी त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सौ. मानसी केळुसकर यांनी संस्थेचे पर्यावरण व वृक्ष संवर्धनाबाबत उद्देश समजावून सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थितांनी वृक्षारोपणानंतर लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करण्याची सामूहिक शपथ घेतली.
श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज संप्रदाय आणि अनुलोम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ह्या उपक्रमाच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल संस्थेचे सचिव तथा भाजप एनजीओ आघाडी जिल्हा संयोजक भालचंद्र उर्फ बबलू राऊत यांनी माहिती दिली असून सहभागींच्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
शाळांच्या यंदाच्या सुट्यांच्या तारखा जाहीर ; एप्रिलअखेर वार्षिक परीक्षा.
शाळांच्या यंदाच्या सुट्यांच्या तारखा जाहीर ;...