ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
परतीच्या पावसाचे थैमान, शेतकऱ्यांचे नुकसान...!

परतीच्या पावसाचे थैमान, शेतकऱ्यांचे नुकसान...!

प्रकाशन: 27 Oct 2025 09:39 PM
वाचन संख्या 388

परतीच्या पावसाचे थैमान, शेतकऱ्यांचे नुकसान...!

Article image


आमदार निलेश राणे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मांडणार शेतकरी व बागायतदारांची परिस्थिती.  


मालवण | ब्यूरो न्यूज : सतत सुरू असलेल्या पावसाने सध्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती मांडणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले अशी माहिती मिळत आहे.


कोकणात, पावसाचा हंगाम संपल्यानंतरही सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस सतत पाऊस कोसळत असल्याने शेती आणि बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने भात, आंबा आणि नाचणी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आणि बागायतदार वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे.


एका बाजूने पाऊस तर दुसरीकडे हत्तीच्या वावरामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. भात पीक कुजून गेलं, कापणी करून वाळत घातलेल्या भातालाही कोंब फुटू लागला, काही ठिकाणी धान्याच्या पेंडी पाण्यामध्ये तरंगत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.


याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही परिस्थिती कळवणार आहे. भेटीसाठी वेळ ही मागणार आहे. कारण कोकणातल्या शेतीबद्दल आणि झालेल्या नुकसानीबद्दल जास्त काही मीडियावर येत नाही. पण आमचा सरकारवर विश्वास आहे की या अडचणीच्या काळात आमच्या शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना दिलासा मिळेल, अशी भूमिका आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केली असल्याची माहिती मिळत आहे.


सौजन्य | मालवण ब्यूरो

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स