ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
पालकमंत्री नितेश राणे यांचा वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे जनता दरबार.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

पालकमंत्री नितेश राणे यांचा वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे जनता दरबार.

प्रकाशन: 11 Sep 2025 12:10 PM
वाचन संख्या 71

पालकमंत्री नितेश राणे यांचा वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे जनता दरबार. 


भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू परब यांचे उपस्थितीचे आवाहन. 


वेंगुर्ले | ब्यूरो न्यूज : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वेंगुर्ले तहसील कार्यालय येथे जनता दरबार आयोजित केला आहे. तरी ज्या ज्या नागरिकांना शासन स्तरावर काही समस्या, अडचणी असतील त्यांनी या जनता दरबारात उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना शासन पातळीवर कोणत्याही अडचणी समस्या असतील तर त्या वेळीच सुटून त्यातून मार्ग निघावा. यासाठी पालकमंत्री नितेश राणे जनता दरबाराद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. यापूर्वी झालेल्या सर्व जनता दरबाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. मंत्री नितेश राणे यांनी समोर आलेल्या अडचणी, समस्या त्या त्या विभागामार्फत सोडविल्या. तर काही समस्या जनता दरबारातच सुटल्या. वेंगुर्ले तालुक्यातील नागरिकांना अशा स्वरूपात काही समस्या किंवा अडचणी असल्या तर त्यांनी उद्या होणाऱ्या जनता दरबारामध्ये सहभागी होऊन आपले प्रश्न लेखी स्वरूपात उपस्थित करावे असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स