31.6 C
Mālvan
Friday, March 21, 2025
IMG-20240531-WA0007

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यमंत्री मत्स्य शेतकरी वीज योजना राबवा, मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर यांची मागणी

- Advertisement -
- Advertisement -

महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना घोषित केली आहे,त्याच धर्तीवर मुख्यमंत्री मत्स्य शेतकरी योजना राबवावी अशी मागणी भाजप सिंधुदुर्गचे मच्छिमार सेल जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी केली आहे. यासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

भारताच्या मत्स्य निर्याती मध्ये मत्स्य शेतीचा वाटा मोठा आहे परंतु यामध्ये महाराष्ट्र राज्य सतराव्या क्रमांक वर आहे.मत्स्य शेतकरी याचा उत्पादना वरील प्रमुख खर्च हा विजेवर होतो. त्यामुळे त्याचे नफ्याचे प्रमाण कायम कमी राहते. तसेच जागतिक हवामान बदल व नैसर्गिक आपत्ती पण नुकसानीस कारणीभुत ठरते.

महाराष्ट्रातील मत्स्य शेतीला बळ देण्यासाठी इतर राज्याप्रमाणे मत्स्य शेतकऱ्यांना संबंधित क्षेत्रात नियोजनबद्ध सवलती देणे आवश्यक आहे. यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजनेसारखीच मुख्यमंत्री मत्स्य शेतकरी वीज योजना राबविण्याची गरज आहे. विशेषतः सागरी किनारपट्टीवर केली जाणारी मत्स्य शेती यामध्ये कोळंबी पालन, गोड्या पाण्यातील पिंजऱ्या मधील मत्स्य शेती, तसेच शोभिवंत मत्स्यपालन यामध्ये मोठ्या प्रमाणात विजेची मागणी असते.

आज रोजी महाराष्ट्रामध्ये केल्या जाणाऱ्या मत्स्य शेती मधील वीज वापरावर सद्यस्थिती मध्ये कोणतेही अनुदान मिळत नाही.

मत्स्य शेतकऱ्यांचा समावेश मुख्यमंत्री मत्स्य शेतकरी वीज योजना घोषित केल्यास त्याचा परिणाम उत्पादन खर्चावर होऊन मत्स्य शेतीच्या नफ्यात वाढ होईल. त्यामुळे अधिकाधिक मत्स्य शेतकरी मत्स्य शेती करण्यास उद्युक्त होतील. ज्याचा फायदा भारताची सागरी मत्स्य पदार्थ निर्यात वाढवणे व रोजगार निर्मितीसाठी होईल.

शासनाने मत्स्य शेती व मत्स्य शेतकरी यांना बळ देण्यासाठी. मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना धर्तीवर, मुख्यमंत्री मत्स्य शेतकरी वीज योजना राबवावी अशी मागणी भाजप सिंधुदुर्गचे मच्छिमार सेल जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी केली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना घोषित केली आहे,त्याच धर्तीवर मुख्यमंत्री मत्स्य शेतकरी योजना राबवावी अशी मागणी भाजप सिंधुदुर्गचे मच्छिमार सेल जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी केली आहे. यासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

भारताच्या मत्स्य निर्याती मध्ये मत्स्य शेतीचा वाटा मोठा आहे परंतु यामध्ये महाराष्ट्र राज्य सतराव्या क्रमांक वर आहे.मत्स्य शेतकरी याचा उत्पादना वरील प्रमुख खर्च हा विजेवर होतो. त्यामुळे त्याचे नफ्याचे प्रमाण कायम कमी राहते. तसेच जागतिक हवामान बदल व नैसर्गिक आपत्ती पण नुकसानीस कारणीभुत ठरते.

महाराष्ट्रातील मत्स्य शेतीला बळ देण्यासाठी इतर राज्याप्रमाणे मत्स्य शेतकऱ्यांना संबंधित क्षेत्रात नियोजनबद्ध सवलती देणे आवश्यक आहे. यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजनेसारखीच मुख्यमंत्री मत्स्य शेतकरी वीज योजना राबविण्याची गरज आहे. विशेषतः सागरी किनारपट्टीवर केली जाणारी मत्स्य शेती यामध्ये कोळंबी पालन, गोड्या पाण्यातील पिंजऱ्या मधील मत्स्य शेती, तसेच शोभिवंत मत्स्यपालन यामध्ये मोठ्या प्रमाणात विजेची मागणी असते.

आज रोजी महाराष्ट्रामध्ये केल्या जाणाऱ्या मत्स्य शेती मधील वीज वापरावर सद्यस्थिती मध्ये कोणतेही अनुदान मिळत नाही.

मत्स्य शेतकऱ्यांचा समावेश मुख्यमंत्री मत्स्य शेतकरी वीज योजना घोषित केल्यास त्याचा परिणाम उत्पादन खर्चावर होऊन मत्स्य शेतीच्या नफ्यात वाढ होईल. त्यामुळे अधिकाधिक मत्स्य शेतकरी मत्स्य शेती करण्यास उद्युक्त होतील. ज्याचा फायदा भारताची सागरी मत्स्य पदार्थ निर्यात वाढवणे व रोजगार निर्मितीसाठी होईल.

शासनाने मत्स्य शेती व मत्स्य शेतकरी यांना बळ देण्यासाठी. मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना धर्तीवर, मुख्यमंत्री मत्स्य शेतकरी वीज योजना राबवावी अशी मागणी भाजप सिंधुदुर्गचे मच्छिमार सेल जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी केली आहे.

error: Content is protected !!