ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बैल गेला जीवानिशी...!

बैल गेला जीवानिशी...!

प्रकाशन: 25 Oct 2021 11:14 PM
वाचन संख्या 91

नांदरुख येथे तुटलेल्या विद्युत भारीत तारेच्या धक्क्याने बैलाचा दुर्दैवी अंत …!

सुदैवाने शेतकरी आणि त्यांची पत्नी बचावली..!


चिंदर | विवेक परब : मालवण तालुक्यातील नांदरुख – नाईकवाडी येथे तुटून पडलेल्या विद्युत भारीत तारेला स्पर्श होऊन शेतकऱ्याचा शेतीच्या बैलाचा दुर्दैवी अंत झाला . केवळ दैव बलवत्तर म्हणून काळजीने त्या बैलाला वाचविण्यास गेलेले शेतकरी पती पत्नी बचावले. सोमवारी सकाळी नांदरुख – नाईकवाडी येथील शेतकरी श्री. विजय अनंत चव्हाण हे आपली गुरे चरण्यासाठी रानात सोडण्यास जात असताना त्यांच्या घरापासून अवघ्या काही अतंरावरच तुटून पडलेल्या विद्युतभारीत तारेचा बैलाला स्पर्श झाल्याने बैल विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यूमुखी पडला. बैलाला वाचविण्यासाठी गेलेले शेतकरी विजय आणि त्यांची पत्नी यानाही काहीसा विजेचा धक्का बसला. परंतु सुदैवाने त्यांना मोठी दुखापत झाली नाही. सदर घटनेची कल्पना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देऊन वीजपुरवठा बंद करण्यात आला. घटनास्थळी नांदरुख सरपंच, तलाठी यांनी पहाणी केली तर पशुवैद्यकिय अधिकारी, वीज वितरण अधिकारी, पोलिस यांनी घटनेचा ठिकाणी येऊन पंचनामा केला. शेतकरी विजय चव्हाण यांचा सुमारे ४५०००/- रुपये किंमतीचा बैल मृत्यूमुखी पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती. शेतकर्यासाठी शेतीचा व उपजिवीकेचाही आधार असणार्या बैलाचा तुटलेल्या विद्युत भारीत तारेमुळे प्राण जाण्याने संपूर्ण शेतकरी कुटुंबालाच मोठी हानी झाली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स