सोनाळी हत्या प्रकरणचा तपास जलदगतीने करण्यात यावा; नावळे उपसरपंच यांची पालकमंत्र्यांकडे मागणी…
सहसंपादक नवलराज काळे- सोनाळी वाणीवाडी येथील जयश्री दत्ताराम साटम यांचा त्यांच्या राहत्या घरी त्यांचा धारदार हत्याराने निर्घृण खुण करण्यात आला ही घटना अत्यंत क्रुरपणे करण्यात आली. या हत्याकांडमुळे संपुर्ण वैभववाडी तालुका हादरला आहे. पोलिस यंत्रणेने प्रथम दर्शनी संशयित म्हणुन आरोपीला अटक केलेली आहेच. परंतु या गुन्ह्याचा जलदगतीने तपास करुन आरोपीस कठोर शिक्षा व्हावी या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. अशी मागणी नावळे उपसरपंच संजय रावराणे यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)