कालावल ते चिंदरचा रस्ता पाहून सार्वजनिक बांधकाम विभागांत किंवा लोकप्रतिनिधींच्या उदार काळजांत 'कालवाकालव' कधी होईल...? (विशेष लक्षवेधी!)
कालावल पुल ते जत्रेचा वड चिंदर रस्ता बनला आहे अपघातातून जीवीतहानीचा राजमार्ग….!
चिंदर |विवेक परब (विशेष लक्षवेधी) : सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्या अधिपत्याखाली असलेला आचरा मालवण रोड वरील चिंदर जत्रेचा वड ते कालावली पुल हा रस्ता गेले अनेक महिने खड्डेमय बनलेला आहे. रस्त्याने येता जाताना वाहन चालकांना व पादचार्यांनादेखील त्यांचा जीव मुठीत धरुन इथून ये जा करावी लागत आहे.
खड्यात रस्ता कि रस्त्यावर खड्डे हे ही समजत नाही आहे. दिवसभरात होणाऱ्या हजारो वाहनांची ये-जा पाहता अपघात होऊन जिवीतहानीची वाट सा.बां. विभाग व लोक प्रतिनिधी पाहत आहेत काय? असा प्रश्न वाहन चालक व जन सामान्यांतून विचारला जातोय.
त्यामुळे ‘कालावल ते चिंदरचा रस्ता पाहून सार्वजनिक बांधकाम विभागांत ‘कालवाकालव’ नेमकी कधी होईल…’ याचा विचार करत कुढत ये जा करणे इतकेच सध्या सर्वसामान्यांना शक्य आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)