बांद्यातील ओंकार नगरात माळरानावर भीषण आग...!
५ एकर क्षेत्रातील आंबा, काजू बागायत जळून खाक
बांदा |राकेश परब :बांदा ओंकार नगर येथे आज माळरानावर भीषण अग्नितांडाव होऊन सुमारे ५ एकर क्षेत्रातील आंबा, काजू बागायत जळून खाक झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे सुमारे ५ लाखाहून अधिक नुकसान झाले. नुकसानीचा पंचनामा न झाल्याने नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही.
ही घटना काल दुपारी घडली. यामध्ये विवेक खेमराज गावकर यांच्या बागेतील १०० आंबा कलमे, २०० काजू कलमे तसेच इतर फळझाडे व बागायतीत पाण्यासाठी टाकण्यात आलेली जलवहिनी जळून खाक झाली. दुपारची वेळ असल्याने व वारा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत ५ एकर क्षेत्रातील बागायत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
येथील मकरंद तोरसकर, मंदार कल्याणकर यांचेही नुकसान झाले. मात्र गांवकर यांना सर्वाधिक नुकसानीस सामोरे जावे लागले. अतिशय भीषण अशा आगीमळे बांदा परिसर हादरुन गेला आहे..!
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)