'विद्या विनयेन शोभते' हा विचार कायम लक्षात ठेवण्याची गरज...!
'विद्या विनयेन् शोभते' हा विचार कायम लक्षात ठेवण्याची गरज...!
मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांची NEET पेपरफुटी, आंदोलन, लाठीचार्ज आणि संबंधित घडामोडींवर प्रतिक्रिया.
मुंबई | ब्यूरो न्यूज : मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी NEET परीक्षेची पेपरफुटी आणि त्यानंतरच्या दिल्लीसह देशात घडलेल्या विविध घडामोडींबाबत एका प्रसिद्धी संदेशाद्वारे त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शैक्षणिक क्षेत्र समजून घेणे आणि त्यासोबत 'विद्या विनयेन् शोभते,' हा प्राथमिक शाळेतील भिंतींवरचा आपला भारतीय सांस्कृतिक सुविचार रोज आचरणात आणण्याचेही त्यांनी आवाहन केले आहे. पेपरफुटीतील दोषींवर कारवाई आणि त्याची तांत्रिक नैतीकता असलेल्या सर्वांचा राजिनामा ही मागणी त्यांनी अधोरेखीत करत पाठिंबा देखिल दर्शवला आहे.
श्रीकांत सावंत यांनी त्यांच्या प्रसिद्धी संदेशात सांगितले आहे की विद्यार्थी व पालकांच्या जेंव्हा तक्रारी व मागण्या सुरू झाल्या तेंव्हाच सुशासन म्हणून संबंधित विभागाच्या माध्यमातून किंवा एखाद्या तटस्थ प्रणालीद्वारा, विद्यार्थ्यांशी संवाद साधणे ही गरज होती. तसेच प्रत्यक्ष आंदोलना दरम्यान काही आंदोलनकर्ते, त्यांचे विविध स्तरातील काही पाठिराखे यांनीही त्यांच्या आंदोलना दरम्यान वर्तनाचा आणि बोलण्याचे आत्मपरीक्षण करत 'आंदोलनाचा नेमका उद्देश' ध्यानात राखणे आवश्यक होते असेही श्रीकांत सावंत यांनी आवर्जून नमूद केले आहे. लाठीचार्ज व कारवाई या घटनांपूर्वी चर्चेसाठी जवळपास २० दिवसांचा अवधी 'नेमका कशासाठी' घेतला गेला, असा सवाल देखिल श्रीकांत सावंत यांनी त्यांच्या प्रसिद्धी संदेशात उपस्थित केला आहे.
देशातील स्थैर्यासाठी आणि मानवतेच्या मनोधैर्यासाठी 'विद्येचा सन्मान' करण्याला प्रथम प्राधान्य देत सुसंवाद घडावा अशी अपेक्षा मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी त्यांच्या प्रसिद्धी संदेशाद्वारे व्यक्त केली आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)