मालवणात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त धम्म रॅली संपन्न.
मालवणात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त धम्म रॅली संपन्न.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवणात फुले शाहू आंबेडकर विचारमंच या संघटनेतर्फे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त १४ एप्रिल रोजी सकाळी समाजमंदिर मालवण येथून समाजमंदिर एस. टी. स्टॅंड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बांगीवाडा अशी भव्य धम्मरॅली काढण्यात आली.
धम्मरॅलीनंतर मामा वरेरकर नाट्यगृह येथे जाहीर सभा संपन्न झाली. या सभेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. बाबासाहेब नदाफ, प्रमुख पाहुणे स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. कैलास राबते, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष रंजन तांबे यांच्यासह नाटककार, लेखक डॉ. श्रीकांत धारपवार, माजी गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, नगरसेवक व मागासवर्गीय कल्याण समिती सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेविका तथा आरोग्य सभापती पूनम चव्हाण, शुभांगी पवार, प्रा. नागेश कदम, सेवानिवृत्त नायब तहसीलदार व विचारमंचचे सचिव आनंद मालवणकर, महिला विभाग अध्यक्षा सौ. माधुरी जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. मिलिंद जाधव यांनी प्रास्ताविक केले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवक युवतींचा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शरीराची, कुटुंबाची पर्वा न करता बहुजन समाजाला प्रकाशात आणण्याचे काम केले. बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार संघर्ष करायला व ज्ञान मिळवायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्र सेवादल कोल्हापूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. बाबासाहेब नदाफ यांनी केले.
यावेळी प्रा. राबते, डॉ. धारपवार, पूनम चव्हाण, सिद्धार्थ जाधव यांनीही विचार मांडले. सिद्धार्थ जाधव व पूनम चव्हाण यांनी आपल्या भाषणात प्रभाग क्रमांक चार मध्ये भव्य समाज मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात रंजन तांबे यांनी फुले शाहू आंबेडकर विचारमंचात तरुणांनी या चळवळीत सहभागी झाले पाहिजे, असे सांगितले. सूत्रसंचालन डी. डी. जाधव यांनी केले तर आभार गुळवे यांनी मानले.
यानंतर दुसऱ्या सत्रात लोकशाहीर सदाशिव निकम कोल्हापूर यांचा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा पुरोगामी जलसा कार्यक्रम झाला. यावेळी नागरिक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
शाळांच्या यंदाच्या सुट्यांच्या तारखा जाहीर ; एप्रिलअखेर वार्षिक परीक्षा.
शाळांच्या यंदाच्या सुट्यांच्या तारखा जाहीर ;...