श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी.
ब्यूरो न्यूज : गणेशोत्सवासाठी कोकणात येणा-या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि विनाअडथळा व्हावा यासाठी रायगड जिल्हा प्रशासन उपाययोजना करणारेय महामार्गावर वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी २३ ऑगस्ट संध्याकाळी ६ वाजल्यापासून २९ऑगस्ट रात्री १२ वाजेपर्यंत मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असणार अशी माहिती मिळत आहे.
२ ते ४ सप्टेंबर आणि ६ ते ८ सप्टेंबर या कालावधीत देखील महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी असणार आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आलेत. या खेरीज मुंबई- गोवा महामार्गावर पोलीस मदत केन्द्र, टोईंग व्हॅन, क्रेन, वाहन दुरुस्ती कक्ष, आपत्कालीन वाहन दुरुस्ती आणि टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा असेल. वैद्यकीय कक्ष, रूग्णवाहिका सेवा, मोफत आपत्कालीन वैद्यकिय उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)