26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

रायबरेली लीगमधून निवडून आणलेले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंसमोर उघडे पडतात ; सुनील गावस्कर खवळले…!

- Advertisement -
- Advertisement -

सय्यद मुश्ताक अली चषकातील खेळाडूंच्या कामगिरीचा विचार करुन आयपिएलचे संघ निवडणे आवश्यक असल्याचाही दिला संघमालकांना सल्ला.

क्रिकेटचा योग्य सन्मान केला नाही तर क्रिकेट तुम्हाला तुमची जागा दाखवून देईलच ; स्वतःला परिपूर्ण समजणार्या क्रिकेटपटूंना सुनिल गावस्कर यांनी समालोचना दरम्यान सुनावले खडे बोल.

क्रीडा : माजी कसोटीपटू तसेच ज्येष्ठ क्रिकेट समालोचक सुनील गावसकर यांनी आयपिएल मध्ये काही प्रतिभावान खेळाडुंच्या घसरलेल्या कामगिरीबद्दल भाष्य करताना खडे बोल सुनावले असून, क्रिकेट खेळाला दुय्यम दर्जा देत स्वतःला परिपूर्ण समजणार्या क्रिकेटपटूंना, क्रिकेट खेळ त्यांची जागा दाखवून देईल असे खवळून सांगितले. १७ मे रोजी वानखेडे मैदानावर खेळवल्या गेलेल्या मुंबई इंडिअन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंटस संघातील सामन्या दरम्यान सुनील गावस्कर समालोचन करत होते त्यावेळी प्रतिभावंत खेळाडुंच्या सुमार कामगिरी बद्दल बोलताना त्यांनी ही गोष्ट सांगितली. खेळाडुंमध्ये प्रतिभा असते परंतु त्यांना पायरी पायरीने शिकत आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसमोर आणले तरच ती प्रतिभा खेळाडूंसाठी दीर्घकाल टिकते परंतु त्यांना परिपक्व बनायचा किंवा क्रिकेटमधील संघर्षासाठीचा पुरेसा काळ न देता थेट आयपिएल मध्ये खेळवले तर प्रतिभावंत खेळाडूचे खच्चीकरण होऊन तो संपू शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले. एखादा खेळाडू या स्पर्धेत एखादा मोसम थेट चमकतो देखिल, परंतु नंतर तो तितक्याच वेगाने मागे पडत पडत लुप्त होत जातो असेही त्यांनी कोणत्याही खेळाडूचे नांव न घेता उदाहरण म्हणून स्पष्ट केले.

गावस्कर पुढे म्हणाले की बहुतांश आयपिएल संघमालक हे खेळाडुंची निवड करताना त्यांना थेट रायबरेली लीगसारख्या क्रिकेटमधून खेळाडू निवडले आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसमोर खेळवले तर ते उघडे पडतात. त्यासाठी राज्यस्तरीय सय्यद मुश्ताक अली चषकातील खेळाडूंच्या कामगिरीचा विचार करुन त्यांना निवडणे आवश्यक असल्याचाही सल्ला त्यांनी संघमालकांना दिला.

मुंबई इंडिअन्सचा संघ त्यांचा शेवटचा सामनाही गमावून गुणतालिकेत शेवटच्या स्थानी राह्यलाने सुनील गावस्कर यांनी अर्ध्या कच्च्या फलंदाज व गोलंदाज यांना परिपूर्ण अष्टपैलू म्हणून खेळवले गेल्याबद्दल जाहीर नाराजीही व्यक्त केली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सय्यद मुश्ताक अली चषकातील खेळाडूंच्या कामगिरीचा विचार करुन आयपिएलचे संघ निवडणे आवश्यक असल्याचाही दिला संघमालकांना सल्ला.

क्रिकेटचा योग्य सन्मान केला नाही तर क्रिकेट तुम्हाला तुमची जागा दाखवून देईलच ; स्वतःला परिपूर्ण समजणार्या क्रिकेटपटूंना सुनिल गावस्कर यांनी समालोचना दरम्यान सुनावले खडे बोल.

क्रीडा : माजी कसोटीपटू तसेच ज्येष्ठ क्रिकेट समालोचक सुनील गावसकर यांनी आयपिएल मध्ये काही प्रतिभावान खेळाडुंच्या घसरलेल्या कामगिरीबद्दल भाष्य करताना खडे बोल सुनावले असून, क्रिकेट खेळाला दुय्यम दर्जा देत स्वतःला परिपूर्ण समजणार्या क्रिकेटपटूंना, क्रिकेट खेळ त्यांची जागा दाखवून देईल असे खवळून सांगितले. १७ मे रोजी वानखेडे मैदानावर खेळवल्या गेलेल्या मुंबई इंडिअन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंटस संघातील सामन्या दरम्यान सुनील गावस्कर समालोचन करत होते त्यावेळी प्रतिभावंत खेळाडुंच्या सुमार कामगिरी बद्दल बोलताना त्यांनी ही गोष्ट सांगितली. खेळाडुंमध्ये प्रतिभा असते परंतु त्यांना पायरी पायरीने शिकत आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसमोर आणले तरच ती प्रतिभा खेळाडूंसाठी दीर्घकाल टिकते परंतु त्यांना परिपक्व बनायचा किंवा क्रिकेटमधील संघर्षासाठीचा पुरेसा काळ न देता थेट आयपिएल मध्ये खेळवले तर प्रतिभावंत खेळाडूचे खच्चीकरण होऊन तो संपू शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले. एखादा खेळाडू या स्पर्धेत एखादा मोसम थेट चमकतो देखिल, परंतु नंतर तो तितक्याच वेगाने मागे पडत पडत लुप्त होत जातो असेही त्यांनी कोणत्याही खेळाडूचे नांव न घेता उदाहरण म्हणून स्पष्ट केले.

गावस्कर पुढे म्हणाले की बहुतांश आयपिएल संघमालक हे खेळाडुंची निवड करताना त्यांना थेट रायबरेली लीगसारख्या क्रिकेटमधून खेळाडू निवडले आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसमोर खेळवले तर ते उघडे पडतात. त्यासाठी राज्यस्तरीय सय्यद मुश्ताक अली चषकातील खेळाडूंच्या कामगिरीचा विचार करुन त्यांना निवडणे आवश्यक असल्याचाही सल्ला त्यांनी संघमालकांना दिला.

मुंबई इंडिअन्सचा संघ त्यांचा शेवटचा सामनाही गमावून गुणतालिकेत शेवटच्या स्थानी राह्यलाने सुनील गावस्कर यांनी अर्ध्या कच्च्या फलंदाज व गोलंदाज यांना परिपूर्ण अष्टपैलू म्हणून खेळवले गेल्याबद्दल जाहीर नाराजीही व्यक्त केली.

error: Content is protected !!