28.6 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

आरोस येथे शिवजयंतीचे औचित्य साधून विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

सावंतवाडी | प्रतिनिधी : विद्यार्थ्यांमध्ये शिवविचार रुजावेत व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने श्री निखिल नाईक व आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बाळा परब यांच्या संकल्पनेतून मागील वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आरोस येथे शिवविचार सोहळा या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावर्षी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस येथे आरोस केंद्रा अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता ही स्पर्धा सुरु होणार आहे. पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी व आकारावी बारावी अशा चार गटात ही स्पर्धा घेतली जाणार असून प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले सन्मानचिन्ह, प्रशस्ती पत्रक व रोख बक्षीस देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे तसेच स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागासाठी शिवकथांवर आधारीत पुस्तकही दिले जाणार आहे. यास्पर्धेचे परीक्षण रंगकर्मी श्री प्रवीण मांजरेकर आणि लेखक, कवी श्री दीपक पटेकर हे करणार आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सावंतवाडी | प्रतिनिधी : विद्यार्थ्यांमध्ये शिवविचार रुजावेत व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने श्री निखिल नाईक व आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बाळा परब यांच्या संकल्पनेतून मागील वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आरोस येथे शिवविचार सोहळा या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावर्षी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस येथे आरोस केंद्रा अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता ही स्पर्धा सुरु होणार आहे. पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी व आकारावी बारावी अशा चार गटात ही स्पर्धा घेतली जाणार असून प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले सन्मानचिन्ह, प्रशस्ती पत्रक व रोख बक्षीस देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे तसेच स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागासाठी शिवकथांवर आधारीत पुस्तकही दिले जाणार आहे. यास्पर्धेचे परीक्षण रंगकर्मी श्री प्रवीण मांजरेकर आणि लेखक, कवी श्री दीपक पटेकर हे करणार आहेत.

error: Content is protected !!