कणकवली | अविनाश गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भालचंद्र महाराज संस्थान यांच्या वतीने, आज ६ फेब्रुवारीला पंढरपूर कडे प्रस्थान करणार्या वारीला धार्मिक सदिच्छा देण्यात आल्या आणि त्यांच्या अल्पोपहाराची सेवा व्यवस्था करण्यात आली. ह. भ. प. श्री विश्वनाथ गवंडळकर, श्री. दीपक मडवी, श्री. रमाकांत गायकवाड महाराज, श्री. लाड माऊली ( श्रावण) व अन्य वारकरी या दिंडीद्वारे पंढरपूर कडे प्रस्थान करत आहेत.
पंढरपूर कडे प्रस्थान करणार्या दिंडिला सदिच्छा व अल्पोपहार सेवा देताना परमहंस बाबा भालचंद्र महाराज संस्थान कणकवली च्या वतीने वारकरी मंडळींना प्रस्थानच्या वेळी चहा नाष्टा अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली, व्यवस्थापक विजय केळुसकर, दादा नार्वेकर आदी मान्यवर व भालचंद्र महाराज भाविक भक्त उपस्थित होते.