26.5 C
Mālvan
Sunday, September 8, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

पानवळची कु. चित्रा पणशीकर ते सावित्रीबाई फुले सन्मानाच्या उपप्राचार्य चित्रा गोस्वामी..!आदर्श पुरस्कारांचा समाज शैक्षणिक चित्रहार.! ( विशेष )

- Advertisement -
- Advertisement -

सुयोग पंडित | मुख्य संपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील बांदा नवभारत शिक्षण संस्थेच्या, खेमराज हायस्कूल मध्ये शिकत असताना ‘चित्रा पणशीकर’ हिला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार प्राप्त झाला होता. तिथून तिच्या पुरस्कार प्रवासाचे चित्र रेखाटन सुरू झाले. नंतर छत्रपती शिवाजी विद्यापीठ, पुणे विद्यापीठ येथून उच्च शिक्षण घेऊन तिने कर्मभूमी म्हणून गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे प्राध्यापक म्हणून योगदानाला सुरुवात केली. मुंबई विद्यापीठाकडून दरवर्षी सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार हा मानाचा पुरस्कार महाविद्यालयात १५ वर्षे स्थायी सेवा करणाऱ्या प्राध्यापिकेला दिला जातो. त्याचे काही महत्वाचे निकष असतात. स्थायी नोकरी, विकास कक्षातील कार्य, सामाजिक कार्य, प्रशासकिय जबाबदारी, संशोधनातील कार्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार वगैरे..! हे सर्व निकष “बाईपण भारी देवा” असे अवघड असतात. या वर्षासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या डॉ चित्रा गोस्वामी यांना शिक्षकदिनी हा सावित्रीबाई फुले सन्मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. होय..! कुमारी चित्रा पणशीकर ते प्राध्यापक चित्रा गोस्वामी अशा कोकणच्या सामाजिक, शैक्षणिक व सात्विक प्रवासी समर्थ कन्येला मिळालेला हा सार्थ पुरस्कार आहे. मुंबई विद्यापीठाच्या फिरोजशहा मेहता भवन मध्ये कुलगुरूंच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

डॉ चित्रा गोस्वामी, यांची २० वर्षे स्थायी सेवा झाली असून, त्यांनी विवध टप्प्यांवर व महत्वाच्या समित्यांवर काम पाहिलेले आहे. यातील पहिला टप्पा म्हणजे महिला विकास कक्ष. त्या रत्नागिरी जिल्ह्याच्या ‘महिला व बाल कल्याण विभागाच्या’ २००६ पासून सदस्य असून, विविध शासकीय कार्यालयासाठी, महिलाश्रमातील महिलांसाठी त्या समुदेशक म्हणून काम पहात आहेत. त्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सभासद असून २००८ पासून ‘महिला विकास कक्षा’ अंतर्गत विविध उपक्रम त्यांनी राबविले आहेत. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) ही समिती सांभाळताना त्यांनी सर्व स्तरांवर महिला जागृती, स्वसंरक्षण कार्यक्रम, महिलांवरील अत्याचार, हिंसा, हुंडा पद्धती यासाठी जागृतीचे कार्यक्रम केले असून, विविध पथनाट्ये, लेख लिहिले आहेत. आकाशवाणीवर ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ , ‘ स्त्रियांचे अधिकार’, ‘कोरोना काळातील स्त्रियांचे योगदान’, ‘समाजातील स्त्रियांचे स्थान’ अशा विषयातून जागृतीचे कार्यक्रम सादर केले आहेत. गरीब मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्यांना पायावर उभे करता येईल असा त्यांचा प्रयत्न असतो. शिवाय स्त्रियांच्या पुनर्वसनाच्या शासकीय कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. या व्यतिरिक्त या विषयावरील सेमिनार, कार्यशाळा आदींमध्ये त्या सक्रिय सहभागी असतात.

महाविद्यालयाच्या कला शाखेच्या त्या उपप्राचार्य असून , हिंदी विषयाचे अध्यापन करतात. आता पर्यंत त्यांनी हिंदी विषयातील ६५ संशोधन पेपर, ३ लघु शोधप्रबंध, १बृहद् शोधप्रबंध असे अचाट संशोधनातील काम केले आहे. त्यांची हिंदी व मराठीतील कविता, लघुकथा, संदर्भ लेखनावरची १७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी ६ पुस्तके देखील संपादित केली आहेत हे विशेष म्हणावे लागेल. त्यांना संस्था अंतर्गत विशेष कार्य पुरस्कार, रत्नागिरी जिल्ह्याचा पोलीस मित्र आणि विविध जिल्हा स्तरीय पुरस्कार, विद्यापीठ स्तरावरील उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावरील हिंदी विषयातील सन्मान, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॉरिशस आणि राॅड्रिग्ज सन्मान प्राप्त झाले आहेत.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा डॉ सुहास पेडणेकर, वर्तमान कुलगुरू प्रा डॉ रविंद्र कुलकर्णी, प्रकुलगुरु प्रा डॉ अजय भामरे उपस्थित होते.

पुरस्कार मिळाल्या बद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री सतिशजी शेवडे, कार्यवाह श्री श्रीकांत दुदगीकर, अन्य मान्यवर सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य , वरिष्ठ प्राध्यापक यांनी व अनेकांनी अभिनंदन केले.

हा पुरस्कार स्विकारताना या सावित्रीबाई फुलेंच्या प्रगल्भ लेकीने जी प्रतिक्रिया दिली ती स्वतःचे श्रेय दुसर्यांसोबत गुंफत एक आदर्शवादी समाज दृष्टी दर्शक आहे. सन्मान स्वीकारत असताना डॉ चित्रा गोस्वामी म्हणाल्या की, हा व्यक्तिगत पुरस्कार किंवा व्यक्तिगत गौरव नसून महाविद्यालय आणि संस्थेतील कर्मचारी ,सहकारी शिक्षक, वरिष्ठ प्राध्यापक, परिवारातील सदस्य, समाजातील मार्गदर्शक या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून मिळालेला सन्मान आहे. यामध्ये रत्नागिरी,जुवेचे रहिवासी फोटोग्राफर श्री समाधान पारकर यांचाही समावेश आहे.

समाजाला अशा आदर्श ‘चित्रांची’ आवश्यकता होती, आहे व राहील आणि म्हणूनच अशा चित्रांचा सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मान होणे ही एक चित्रालेखी प्रवासाची मालिका तथा हा चित्रहार अथक सुरू राहील.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सुयोग पंडित | मुख्य संपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील बांदा नवभारत शिक्षण संस्थेच्या, खेमराज हायस्कूल मध्ये शिकत असताना 'चित्रा पणशीकर' हिला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार प्राप्त झाला होता. तिथून तिच्या पुरस्कार प्रवासाचे चित्र रेखाटन सुरू झाले. नंतर छत्रपती शिवाजी विद्यापीठ, पुणे विद्यापीठ येथून उच्च शिक्षण घेऊन तिने कर्मभूमी म्हणून गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे प्राध्यापक म्हणून योगदानाला सुरुवात केली. मुंबई विद्यापीठाकडून दरवर्षी सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार हा मानाचा पुरस्कार महाविद्यालयात १५ वर्षे स्थायी सेवा करणाऱ्या प्राध्यापिकेला दिला जातो. त्याचे काही महत्वाचे निकष असतात. स्थायी नोकरी, विकास कक्षातील कार्य, सामाजिक कार्य, प्रशासकिय जबाबदारी, संशोधनातील कार्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार वगैरे..! हे सर्व निकष "बाईपण भारी देवा" असे अवघड असतात. या वर्षासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या डॉ चित्रा गोस्वामी यांना शिक्षकदिनी हा सावित्रीबाई फुले सन्मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. होय..! कुमारी चित्रा पणशीकर ते प्राध्यापक चित्रा गोस्वामी अशा कोकणच्या सामाजिक, शैक्षणिक व सात्विक प्रवासी समर्थ कन्येला मिळालेला हा सार्थ पुरस्कार आहे. मुंबई विद्यापीठाच्या फिरोजशहा मेहता भवन मध्ये कुलगुरूंच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

डॉ चित्रा गोस्वामी, यांची २० वर्षे स्थायी सेवा झाली असून, त्यांनी विवध टप्प्यांवर व महत्वाच्या समित्यांवर काम पाहिलेले आहे. यातील पहिला टप्पा म्हणजे महिला विकास कक्ष. त्या रत्नागिरी जिल्ह्याच्या ‘महिला व बाल कल्याण विभागाच्या’ २००६ पासून सदस्य असून, विविध शासकीय कार्यालयासाठी, महिलाश्रमातील महिलांसाठी त्या समुदेशक म्हणून काम पहात आहेत. त्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सभासद असून २००८ पासून ‘महिला विकास कक्षा’ अंतर्गत विविध उपक्रम त्यांनी राबविले आहेत. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) ही समिती सांभाळताना त्यांनी सर्व स्तरांवर महिला जागृती, स्वसंरक्षण कार्यक्रम, महिलांवरील अत्याचार, हिंसा, हुंडा पद्धती यासाठी जागृतीचे कार्यक्रम केले असून, विविध पथनाट्ये, लेख लिहिले आहेत. आकाशवाणीवर 'लेक वाचवा, लेक शिकवा' , ' स्त्रियांचे अधिकार', 'कोरोना काळातील स्त्रियांचे योगदान', 'समाजातील स्त्रियांचे स्थान' अशा विषयातून जागृतीचे कार्यक्रम सादर केले आहेत. गरीब मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्यांना पायावर उभे करता येईल असा त्यांचा प्रयत्न असतो. शिवाय स्त्रियांच्या पुनर्वसनाच्या शासकीय कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. या व्यतिरिक्त या विषयावरील सेमिनार, कार्यशाळा आदींमध्ये त्या सक्रिय सहभागी असतात.

महाविद्यालयाच्या कला शाखेच्या त्या उपप्राचार्य असून , हिंदी विषयाचे अध्यापन करतात. आता पर्यंत त्यांनी हिंदी विषयातील ६५ संशोधन पेपर, ३ लघु शोधप्रबंध, १बृहद् शोधप्रबंध असे अचाट संशोधनातील काम केले आहे. त्यांची हिंदी व मराठीतील कविता, लघुकथा, संदर्भ लेखनावरची १७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी ६ पुस्तके देखील संपादित केली आहेत हे विशेष म्हणावे लागेल. त्यांना संस्था अंतर्गत विशेष कार्य पुरस्कार, रत्नागिरी जिल्ह्याचा पोलीस मित्र आणि विविध जिल्हा स्तरीय पुरस्कार, विद्यापीठ स्तरावरील उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावरील हिंदी विषयातील सन्मान, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॉरिशस आणि राॅड्रिग्ज सन्मान प्राप्त झाले आहेत.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा डॉ सुहास पेडणेकर, वर्तमान कुलगुरू प्रा डॉ रविंद्र कुलकर्णी, प्रकुलगुरु प्रा डॉ अजय भामरे उपस्थित होते.

पुरस्कार मिळाल्या बद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री सतिशजी शेवडे, कार्यवाह श्री श्रीकांत दुदगीकर, अन्य मान्यवर सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य , वरिष्ठ प्राध्यापक यांनी व अनेकांनी अभिनंदन केले.

हा पुरस्कार स्विकारताना या सावित्रीबाई फुलेंच्या प्रगल्भ लेकीने जी प्रतिक्रिया दिली ती स्वतःचे श्रेय दुसर्यांसोबत गुंफत एक आदर्शवादी समाज दृष्टी दर्शक आहे. सन्मान स्वीकारत असताना डॉ चित्रा गोस्वामी म्हणाल्या की, हा व्यक्तिगत पुरस्कार किंवा व्यक्तिगत गौरव नसून महाविद्यालय आणि संस्थेतील कर्मचारी ,सहकारी शिक्षक, वरिष्ठ प्राध्यापक, परिवारातील सदस्य, समाजातील मार्गदर्शक या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून मिळालेला सन्मान आहे. यामध्ये रत्नागिरी,जुवेचे रहिवासी फोटोग्राफर श्री समाधान पारकर यांचाही समावेश आहे.

समाजाला अशा आदर्श 'चित्रांची' आवश्यकता होती, आहे व राहील आणि म्हणूनच अशा चित्रांचा सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मान होणे ही एक चित्रालेखी प्रवासाची मालिका तथा हा चित्रहार अथक सुरू राहील.

error: Content is protected !!