आयुष्यमान भारत योजनेचे स्मार्ट कार्ड वाटप….!
कणकवली | उमेश परब : केंद्रातर्फे आखलेली व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनेच्या स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन कलमठ मध्ये झाले. या जनहीत शिबिराला लाभार्थींनी उत्तम प्रतिसाद देत त्यात १०० पेक्षा जास्त लाभार्थिनींनीही या शिबिराचा लाभ घेतला.
शिबिराच्या आयोजनावेळी श्री. महादेव शिराळकर व श्री.श्रीकांत दोंडले यांनी नोंदणी केली.कलमठ गावात शिबिर होण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्याकडे संदीप मेस्त्री यानी मागणी केली होती. कलमठ गावातील लाभार्थीनी या ‘स्मार्ट शिबिराबद्दल’ समाधान व्यक्त केले.