26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आमदार वैभव नाईक यांनी आंदुर्ले येथील ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिक कै. भाऊ सामंत यांच्या कुटुंबियांची निवासस्थानी घेतली भेट ; ५५ वर्षांपूर्वी लिहीलेल्या हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्राचे केले वाचन. ( संपादकीय विशेष )

- Advertisement -
- Advertisement -

आमदार वैभव नाईक यांनी कै.भाऊ सामंत यांच्या निष्ठेला सलाम करुन कुटुंबियांच्या साधेपणाची केली विशेष प्रशंसा.

सुयोग पंडित | मुख्य संपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या आंदुर्ले येथे आमदार वैभव नाईक यांनी ज्येष्ठ शिवसैनिक व हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेबठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे कै. भाऊ सामंत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची नुकतीच भेट घेतली. ही भेट मतदार संघातील विविध भेटी दरम्यान योगायोगाने झाल्याचेही आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.

कोकणातील लोक कसे निष्ठावंत असतात,निष्ठेपुढे पदांची अपेक्षा ठेवत नाही याचे उत्तम उदाहरण कै.भाऊ सामंत होते असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले. कै.सामंत यांच्याबद्दल यापूर्वी ऐकले होते परंतु या भेटीवेळी कुटुंबियांनी भाऊंच्या आठवणींना उजाळा दिला.याप्रसंगी चर्चेवेळी आमदार वैभव नाईक यांना हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेबांनी ५ फेब्रुवारी १९६८ साली सामंत यांना दिलेले पत्र वाचण्यास मिळाले. या पत्रात सामंत यांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून बाळासाहेबांनी उल्लेख केला आहे. यावरून त्यांची शिवसेनेवर असलेली निष्ठा आणि बाळासाहेबांचा त्यांच्यावर किती विश्वास होता हे दिसून आल्याची भावना आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली.

आंदुर्ले येथील कै.भाऊ सामंत हे ठाणे येथे राहत होते. ठाणे जिल्ह्याचे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ते ओळखले जायचे. ठाणे नगरपालिकेची निवडणूक जिंकण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता. स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या हस्ताक्षरात लिहलेल्या पत्रात याचा उल्लेख केला आहे. कै.भाऊ सामंत यांनी ठाणे नगरपालिका निवडणुकीत बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. बाळासाहेब त्यांच्याच घरी बसून निवडणुकीची रणनीती आखत होते. १९६८ च्या काळात ठाणे नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकविण्यामध्ये सामंत यांचा मोठा वाटा होता.सामंत यांची शिवसेनेवर असलेली निष्ठा पाहून बाळासाहेबांनी त्यांना अनेक पदे भूषविण्याची संधी दिली व विनंतीही केली होती.परंतु शेवटपर्यंत निष्ठावंत शिवसैनिक म्हणूनच काम करण्यावर ते ठाम राहिले.त्यावेळी ते पदांच्या मागे गेले असते तर महापौर, खासदार, मंत्री झाले असते. बाळासाहेबांचे एवढे प्रेम त्यांच्यावर होते. त्यांनीही बाळासाहेबांसाठी निष्ठापूर्वक काम केले होते. कोकणातील लोक किती निष्ठावंत असतात प्रसंगी कुठल्या पदाची देखील ते अपेक्षा धरत नाहीत हे सामंत यांनी दाखवून दिले. सामंतांसारखे अनेक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक ठाण्यामध्ये बाळासाहेबांच्या पाठीशी ठाम राहिले होते.आज ते प्रवाहात नसले तरी ठाणे नगरपालिका जिंकण्यासाठी त्यांनीही मोलाचे योगदान दिले होते. खडतर परिस्थितीत अनेक संकटांना सामोरे जात कै.सामंत यांनी ठाण्यात शिवसेनेची संघटना वाढविण्याचे काम केले होते. आताचे ठाण्याचे नेते संबोधले जाणारे तेव्हा कोणी नव्हते. आताच्या राजकारण्यांप्रमाणे पदांच्या लालसेपोटी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही सामंत यांनी शिवसेनेशी गद्दारी केली नाही. नंतरच्या काळात आंदुर्ले येथे गांवाकडच्या घरी शेतीवाडी सांभाळण्यासाठी त्यांना गावी यावे लागले.परंतु कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेशी असलेली निष्ठा त्यांनी सोडली नाही. त्यांचे कुटुंबीय उच्चशिक्षित असून देखील ते राजकारणापासून लांब आहेत. शिवसेनेकडून त्यांना जे प्रेम मिळालं त्यात त्यांनी समाधान व्यक्त केले.

ठाण्यामध्ये शिवसेनेची संघटना वाढविण्यामध्ये अशा असंख्य भाऊ सामंतांचा हात आहे. परंतु त्यांचे कुटूंबिय या गोष्टींचा कुठेही गाजावाजा करत नाहीत व साधेपणाला जपतात. अशा निष्ठावंतांची दखल जनता घेत असते असे प्रतिपादन करुन आमदार वैभव नाईक यांनी अशा सर्व निष्ठावंतांना सलाम केला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आमदार वैभव नाईक यांनी कै.भाऊ सामंत यांच्या निष्ठेला सलाम करुन कुटुंबियांच्या साधेपणाची केली विशेष प्रशंसा.

सुयोग पंडित | मुख्य संपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या आंदुर्ले येथे आमदार वैभव नाईक यांनी ज्येष्ठ शिवसैनिक व हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेबठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे कै. भाऊ सामंत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची नुकतीच भेट घेतली. ही भेट मतदार संघातील विविध भेटी दरम्यान योगायोगाने झाल्याचेही आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.

कोकणातील लोक कसे निष्ठावंत असतात,निष्ठेपुढे पदांची अपेक्षा ठेवत नाही याचे उत्तम उदाहरण कै.भाऊ सामंत होते असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले. कै.सामंत यांच्याबद्दल यापूर्वी ऐकले होते परंतु या भेटीवेळी कुटुंबियांनी भाऊंच्या आठवणींना उजाळा दिला.याप्रसंगी चर्चेवेळी आमदार वैभव नाईक यांना हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेबांनी ५ फेब्रुवारी १९६८ साली सामंत यांना दिलेले पत्र वाचण्यास मिळाले. या पत्रात सामंत यांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून बाळासाहेबांनी उल्लेख केला आहे. यावरून त्यांची शिवसेनेवर असलेली निष्ठा आणि बाळासाहेबांचा त्यांच्यावर किती विश्वास होता हे दिसून आल्याची भावना आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली.

आंदुर्ले येथील कै.भाऊ सामंत हे ठाणे येथे राहत होते. ठाणे जिल्ह्याचे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ते ओळखले जायचे. ठाणे नगरपालिकेची निवडणूक जिंकण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता. स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या हस्ताक्षरात लिहलेल्या पत्रात याचा उल्लेख केला आहे. कै.भाऊ सामंत यांनी ठाणे नगरपालिका निवडणुकीत बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. बाळासाहेब त्यांच्याच घरी बसून निवडणुकीची रणनीती आखत होते. १९६८ च्या काळात ठाणे नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकविण्यामध्ये सामंत यांचा मोठा वाटा होता.सामंत यांची शिवसेनेवर असलेली निष्ठा पाहून बाळासाहेबांनी त्यांना अनेक पदे भूषविण्याची संधी दिली व विनंतीही केली होती.परंतु शेवटपर्यंत निष्ठावंत शिवसैनिक म्हणूनच काम करण्यावर ते ठाम राहिले.त्यावेळी ते पदांच्या मागे गेले असते तर महापौर, खासदार, मंत्री झाले असते. बाळासाहेबांचे एवढे प्रेम त्यांच्यावर होते. त्यांनीही बाळासाहेबांसाठी निष्ठापूर्वक काम केले होते. कोकणातील लोक किती निष्ठावंत असतात प्रसंगी कुठल्या पदाची देखील ते अपेक्षा धरत नाहीत हे सामंत यांनी दाखवून दिले. सामंतांसारखे अनेक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक ठाण्यामध्ये बाळासाहेबांच्या पाठीशी ठाम राहिले होते.आज ते प्रवाहात नसले तरी ठाणे नगरपालिका जिंकण्यासाठी त्यांनीही मोलाचे योगदान दिले होते. खडतर परिस्थितीत अनेक संकटांना सामोरे जात कै.सामंत यांनी ठाण्यात शिवसेनेची संघटना वाढविण्याचे काम केले होते. आताचे ठाण्याचे नेते संबोधले जाणारे तेव्हा कोणी नव्हते. आताच्या राजकारण्यांप्रमाणे पदांच्या लालसेपोटी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही सामंत यांनी शिवसेनेशी गद्दारी केली नाही. नंतरच्या काळात आंदुर्ले येथे गांवाकडच्या घरी शेतीवाडी सांभाळण्यासाठी त्यांना गावी यावे लागले.परंतु कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेशी असलेली निष्ठा त्यांनी सोडली नाही. त्यांचे कुटुंबीय उच्चशिक्षित असून देखील ते राजकारणापासून लांब आहेत. शिवसेनेकडून त्यांना जे प्रेम मिळालं त्यात त्यांनी समाधान व्यक्त केले.

ठाण्यामध्ये शिवसेनेची संघटना वाढविण्यामध्ये अशा असंख्य भाऊ सामंतांचा हात आहे. परंतु त्यांचे कुटूंबिय या गोष्टींचा कुठेही गाजावाजा करत नाहीत व साधेपणाला जपतात. अशा निष्ठावंतांची दखल जनता घेत असते असे प्रतिपादन करुन आमदार वैभव नाईक यांनी अशा सर्व निष्ठावंतांना सलाम केला आहे.

error: Content is protected !!