28.5 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आमदार नितेश राणे यांचे नांदगांव येथील वक्तव्य दुर्दैवी व खेदजनक : मनसे राज्य सरचिटणीस परशुराम ऊर्फ जिजी उपरकर.

- Advertisement -
- Advertisement -

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यावरही ‘राजकीय ढोंगीपणा’ करत असल्याचा आरोप.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतल्या मनसे संपर्क कार्यालयातील पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार व मनसे राज्य सरचिटणीस परशुराम ऊर्फ जिजी उपरकर यांनी भाजपा ,आमदार नितेश राणे आणि शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यावर चौफेर शाब्दिक हल्ला चढवला .

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नांदगांव येथील एका प्रचार सभेत भाजपाच्या,” विचाराचा सरपंच द्या अन्यथा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांसह मी निधी देणार नाही”, असे खेदजनक व दुर्दैवी वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केले आहे. या विरोधात जिल्ह्यातील सर्व पक्षांनी पेटून उठायला हवे असे आवाहन मनसे राज्य सरचिटणीस आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज केले.

आमदार राणे यांना पाठिंबा देणार्या शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनीही ‘आता राणेंचा दहशतवाद संपला’ असे जाहीर करावे असा टोलाही परशुराम उपरकर यांनी लगावला आहे .
ते म्हणाले, भाजपा असेल तिथेच निधी, असे जर दबाव तंत्राचे राजकारण भाजपाने सुरू केले असेल तर जिल्ह्यातील सर्व पक्षांनी पेटून उठल पाहिजे. जनतेच्या विरोधात भाजपा ने सुरु केलेली दडपशाही मोडीत काढण्याची गरज आहे. निवडणुकी नंतर या दडपशाही विरोधात सर्व पक्षांनी पेटून उठलं पाहिजे असे आवाहन श्री. उपरकर यांनी केल. राज्य व केंद्र सरकार कडून थेट निधी ग्रा प ला देण्यात येतो. भाजपा च्या विचारांचा सरपंच असलेल्या जिल्ह्यातील किती ग्रामपंचायतींचा विकास केला असा सवाल उपरकर यांनी उपस्थित केला. भाजपची सत्ता असलेल्या बहुतांश म ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये आजही खड्डेमय रस्ते, काही ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये स्ट्रीट लाईट नाही, दवाखान्यात डॉक्टर नाही, रेशन वर धान्य नाही ही वस्तुस्थिती असल्याचे प्रतिपादन उपरकर यांनी केले.

आमदार नितेश राणे यांच्या संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राणेंच्या वक्तव्याचे समर्थन करताना आतापर्यंत राणे कुटुंबाचा दहशतवाद संपवण्यासाठी शिवसेनेत गेल्याचे वक्तव्य केले परंतु या दरम्यान दिपक केसरकर यांचे खरे रूप समोर आलं. दीपक केसरकर यांनी राणेंच्या वक्तव्याचे समर्थन करत असताना दहशतवाद संपल्याची भूमिका घेत आता राणें सोबत केसरकर बंद खोलीत चर्चा करत असल्याचा आरोपही उपरकर यांनी केला. राष्ट्रवादी, त्यानंतर शिवसेना व आता पुन्हा शिंदे गट असे ढोंगी पणा केसरकर यांनी केला. आतापर्यंत राणेंच्या दहशतवादावर बोलणाऱ्या केसरकर यांनी राणेंचा दहशतवाद आता संपला हे जाहीर करावं असा आव्हान उपरकर यांनी दिल आहे. दीपक केसरकर यांची दहशतवाद विरोधाच्या मुद्द्यावरून राजकीय कारकीर्द सुरू झाली. पण डीएड, बीएड, शिक्षक प्रश्न शिक्षण मंत्री असलेले दीपक केसरकर सोडवतील, काय, गळक्या शाळा ना निधी देतील काय असा प्रश्नही मनसे नेते व माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर यांनी उपस्थित केला.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यावरही 'राजकीय ढोंगीपणा' करत असल्याचा आरोप.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतल्या मनसे संपर्क कार्यालयातील पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार व मनसे राज्य सरचिटणीस परशुराम ऊर्फ जिजी उपरकर यांनी भाजपा ,आमदार नितेश राणे आणि शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यावर चौफेर शाब्दिक हल्ला चढवला .

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नांदगांव येथील एका प्रचार सभेत भाजपाच्या," विचाराचा सरपंच द्या अन्यथा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांसह मी निधी देणार नाही", असे खेदजनक व दुर्दैवी वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केले आहे. या विरोधात जिल्ह्यातील सर्व पक्षांनी पेटून उठायला हवे असे आवाहन मनसे राज्य सरचिटणीस आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज केले.

आमदार राणे यांना पाठिंबा देणार्या शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनीही 'आता राणेंचा दहशतवाद संपला' असे जाहीर करावे असा टोलाही परशुराम उपरकर यांनी लगावला आहे .
ते म्हणाले, भाजपा असेल तिथेच निधी, असे जर दबाव तंत्राचे राजकारण भाजपाने सुरू केले असेल तर जिल्ह्यातील सर्व पक्षांनी पेटून उठल पाहिजे. जनतेच्या विरोधात भाजपा ने सुरु केलेली दडपशाही मोडीत काढण्याची गरज आहे. निवडणुकी नंतर या दडपशाही विरोधात सर्व पक्षांनी पेटून उठलं पाहिजे असे आवाहन श्री. उपरकर यांनी केल. राज्य व केंद्र सरकार कडून थेट निधी ग्रा प ला देण्यात येतो. भाजपा च्या विचारांचा सरपंच असलेल्या जिल्ह्यातील किती ग्रामपंचायतींचा विकास केला असा सवाल उपरकर यांनी उपस्थित केला. भाजपची सत्ता असलेल्या बहुतांश म ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये आजही खड्डेमय रस्ते, काही ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये स्ट्रीट लाईट नाही, दवाखान्यात डॉक्टर नाही, रेशन वर धान्य नाही ही वस्तुस्थिती असल्याचे प्रतिपादन उपरकर यांनी केले.

आमदार नितेश राणे यांच्या संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राणेंच्या वक्तव्याचे समर्थन करताना आतापर्यंत राणे कुटुंबाचा दहशतवाद संपवण्यासाठी शिवसेनेत गेल्याचे वक्तव्य केले परंतु या दरम्यान दिपक केसरकर यांचे खरे रूप समोर आलं. दीपक केसरकर यांनी राणेंच्या वक्तव्याचे समर्थन करत असताना दहशतवाद संपल्याची भूमिका घेत आता राणें सोबत केसरकर बंद खोलीत चर्चा करत असल्याचा आरोपही उपरकर यांनी केला. राष्ट्रवादी, त्यानंतर शिवसेना व आता पुन्हा शिंदे गट असे ढोंगी पणा केसरकर यांनी केला. आतापर्यंत राणेंच्या दहशतवादावर बोलणाऱ्या केसरकर यांनी राणेंचा दहशतवाद आता संपला हे जाहीर करावं असा आव्हान उपरकर यांनी दिल आहे. दीपक केसरकर यांची दहशतवाद विरोधाच्या मुद्द्यावरून राजकीय कारकीर्द सुरू झाली. पण डीएड, बीएड, शिक्षक प्रश्न शिक्षण मंत्री असलेले दीपक केसरकर सोडवतील, काय, गळक्या शाळा ना निधी देतील काय असा प्रश्नही मनसे नेते व माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर यांनी उपस्थित केला.

error: Content is protected !!