मुंबई | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्य मंत्रिमडळाच्या आज झालेल्या बैठकीत महत्त्वाच्या निर्णय घेतले गेले.
माणगांव, रामटेक, इगतपुरी, बेलापूर, कर्जत, वाई, येवला, परांडा येथे न्यायालये स्थापन करून पदनिर्मिती करणार असल्याचा निर्णय विधी व न्याय विभागाने घेतला आहे .
तसेच ऊर्जा विभागाच्या एका निर्णयानुसार अती उच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरिता सुधारित धोरण जाहीर होणार असल्याचे समजते.