ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
युक्रेन युद्धानंतर ऊर्जा क्षेत्रातील परिणामामुळे आर्थिक मंदीची  दाट शक्यता : माजी केंद्रीय मंत्री श्री सुरेश प्रभू.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

युक्रेन युद्धानंतर ऊर्जा क्षेत्रातील परिणामामुळे आर्थिक मंदीची दाट शक्यता : माजी केंद्रीय मंत्री श्री सुरेश प्रभू.

प्रकाशन: 10 Oct 2022 01:30 PM
वाचन संख्या 38

जैवविविधता जपणे ही आजची महत्वाची गरज असल्याचेही केले स्पष्ट.

सावंतवाडी | ब्युरो न्यूज : माजी केंद्रीय मंत्री व पर्यावरण तसेच अर्थकारणाचे गाढे अभ्यासक श्री.सुरेश प्रभू यांनी जागतीक मंदी व पर्यावरण अशा विषयांवर सावंतवाडी संस्थानात पत्रकारांशी संवाद साधला. सावंतवाडी संस्थान येथे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी उपस्थित माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी भाजपचे युवा नेते युवराज लखन राजे भोसले तसेच अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर उपस्थित होते.

दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच सध्या जागतिक अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. युक्रेन युद्धामुळे ऊर्जा निर्मितीवर परिणाम होणार असल्याने भविष्यात जनमानसावर परिणाम करणारी अर्थव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच जगावर पर्यावरणीय बदलामुळे हवामानाचा देखील परिणाम होत आहे. जगातील अनेक देशातील नद्या ह्या कोरड्या पडत आहेत. पर्यावरणीय बदल जगाची गंभीर परिस्थिती निर्माण करणारा ठरेल. जगाची परिस्थिती ही आयसीयूमध्ये असल्यासारखी होण्याची शक्यता असल्याची भिती माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली.

जैवविविधता, नद्या हे फारच महत्त्वाचे आहे. पश्चिम घाट आणि इंस्टंट घाट जागतिक पातळीवर पर्यावरण रक्षण करणारे होते. दोन्ही ठिकाणी परिणाम झाला तर हवामान बदलाची मोठी शक्यता आहे. समुद्रात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे, ती नष्ट होण्याची भीती आहे. तसे झाले तर माशापेक्षा प्लास्टिकच वाढेल. देशाला पर्यावरणीय बदलाचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे पश्चिम घाट, इंस्टंट घाटातील जैवविविधतेचे संरक्षणाची गरज आहे.जगाची वाटचाल अत्यंत कठीण आणि भयंकर मार्गावर चालली असल्याची चिंता त्यांनी बोलून दाखवली.

(फोटो सौजन्य : सावंतवाडी ब्युरो)

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स