ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार वैभव नाईक यांच्या विचारणेनंतर दोन दिवसात कार्यवाही करण्याचे पाणीपुरवठा मंत्र्यांचे आश्वासन..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार वैभव नाईक यांच्या विचारणेनंतर दोन दिवसात कार्यवाही करण्याचे पाणीपुरवठा मंत्र्यांचे आश्वासन..!

प्रकाशन: 22 Aug 2022 06:26 PM
वाचन संख्या 113

मिशन अंतर्गत कामांतील त्रुटींकडे वेधले आमदार वैभव नाईक यांनी लक्ष..!

मुंबई | ब्युरो न्यूज : मिशन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नळ योजनांच्या कामांमधील त्रुटींबाबत आज आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले. त्रुटींमुळे सदर निविदांना ठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला नसल्याची वस्तुस्थिती मांडली त्यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसात या संदर्भात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

आमदार वैभव नाईक म्हणाले, मिशन योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 546 नळपाणी योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. दोनवेळा निविदा प्रक्रिया राबवुन देखील केवळ १८० निविदांनाच ठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला. मिशनची योजना जेव्हा सुरु झाली तेव्हा घाईगडबडीने अंदाजपञक केल्याने हि अंदाजपत्रके योग्य झाली नाहीत. त्याचबरोबर या योजनांसाठी १० टक्के लोकवर्गणी घेण्याची अट असल्याने या योजनांच्या निविदांना ठेकेदारांचा प्रतिसाद मिळालेला नाही.त्यामुळे उर्वरित कामांची फेर निविदा काढणार का? किंवा १० टक्के लोकवर्गणीची अट शिथिल करणार का?अथवा नवीन अंदाजपत्रक करणार का? अशी विचारणा आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात केली. मिशन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नळ योजनांच्या कामांमधील त्रुटी बाबत सरकारचे लक्ष वेधले. यासंदर्भात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर देत असताना दोन दिवसात या संदर्भात कार्यवाही करण्याचे आश्वासन विधानसभेत दिले अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स